Water supply system is in shambles in the CM’s constituency : हजारो नागरिक तहानलेले; कंत्राटदारांनी जलवाहिन्या बाधित केल्या
Nagpur राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मुलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासकीय उदासीनतेचा खोडा पडत असेल तर इतर वस्त्यांची काय अवस्था असेल, याचा विचार केलेलाच बरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये सध्या पाणीपुरवठा यंत्रणेचे हेच हाल आहेत. त्यावर प्रशासन उपाययोजना करणार की, मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनपाच्या अधिकाऱ्यांची हलगर्जी व कंत्राटदारांच्या मनमानीचा नागपुरातील जनतेला फटका बसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील हजारो नागरिक पाण्याची प्रतिक्षा करत आहेत. कंत्राटदारांनी जलवाहिन्याच बाधित केल्याने पाणीपुरवठा यंत्रणेला फटका बसला आहे.
Compulsion of Hindi Language : ‘हिंदी शिकवाल तर याद राखा’, मनसेचा बुलढाण्यात इशारा
आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी शहरात सुरू असलेले सर्व खोदकाम आटोक्यात आणावे अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत तीन कंत्राटदारांवर असमाधानकारक काम केल्यामुळे १ कोटीचा दंड ठोठावला होता. त्याचा धसका घेत शहरात सुरू असलेल्या कामाला कंत्राटदारांनी गती दिली आहे. त्यामुळे मनमानी खोदकाम सुरू आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या बाधित होत आहे. अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
Local Body elections : स्थानिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ‘ॲक्शन मोड’मध्ये!
१६, १७, १८ आणि १९ जूनदरम्यान प्रतापनगर चौक, बिजलीनगर सिव्हिल लाइन्स, हसनबाग गेट, शारदा माता चौक, वैष्णोदेवी चौक, प्रताप नगर आणि रविनगर चौक येथे सुरू असलेल्या विकासकामाच्या दरम्यान कंत्राटदारांकडून जलवाहिन्या बाधित झाल्या. त्याचा फटका शहरातील हजारो घरांना बसला आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची नियमित सेवा विस्कळीत झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टँकरची मागणी वाढली आहे. मागणी पूर्ण करण्यास ओसीडब्ल्यू असमर्थ ठरत आहे.
AYUSH Ministry : आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हजारो महिलांवर उपासमारीची वेळ!
गेल्या अनेक महिन्यांपासून जलवाहिन्या खराब होण्याचे प्रकार सुरूच आहेत, मात्र जून महिन्यातच जलवाहिन्या बाधित झाल्याच्या १७ घटना घडल्या आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, गावंडे ले-आउट, त्रिशरण नगर, शास्त्री ले-आउट, ट्रस्ट कॉलनी, सेंट्रल एक्साईज कॉलनी, पायनियर सोसायटी येथील सुमारे ९०० रहिवाशांना पाणीपुरवठा झालेला नाही.
१७ जून दुपारी २ वाजता बिजली नगरजवळ पाईपलाईन फुटली. तर धंतोली झोनमधील रेशीमबाग कमांड एरीया, हनुमाननगर जलकुंभ, वंजारीनगर (जुने आणि नवीन) जलकुंभावरील जवळपास २२००० ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. कंत्राटदाराने दुरुस्ती करण्यास नकार दिल्याने ओसीडब्ल्यूची OCW टीम काम करीत आहे.