Breaking

Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !

Congress leader Harshvardhan Sapkal attacks BJP : काँग्रेसजनांच्या विचारांतून दिसतेय भक्त प्रल्हादची भक्ती

Parbhani : काँग्रेसचा सर्व धर्म समभावाचा विचार आहे, तर दुसरीकडे रावणाचा छळणारा विचार आहे. भक्त प्रल्हादच्या भक्तीप्रमाणे काँग्रेसजनांची भक्ती विचार आणि आचरणातून दिसते आहे. दुसरा जो विचार आहे, तो पक्षांतर करायला सांगतो. पण भक्त प्रल्हादच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला, तसाच अवतार भविष्यात ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपचे खलत्व नष्ट करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

परभणीमध्ये झालेल्या सद्भावना यात्रेदरम्यान सपकाळ बोलत होते. यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रमेश बागवे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी शहर जिल्ह्याध्यक्ष नदीम इनामदार, अॅड. गणेश पाटील, मोहन जोशी, तुकाराम रेंगे पाटील. ब्रिज दत्त, रामचंद्र दळवी, मुजाहिद खान, केदार साळुंके, बाळासाहेब देशमुख, अभय देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Uddhav Thackeray : भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाचे प्रयत्न, पण भाजपकडून दरवाजे बंद !

राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परभणीतही असाच एक प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी काँग्रेस सद्भावना यात्रा काढत आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.

Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !

सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण खराब करत आहेत. अशात काँग्रेस सद्भावना यात्रा काढून सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरली जात आहेत. ठेकेदारांच्याच फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण काँग्रेस त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले.