Breaking

Dangerous roads : कमकुवत पुलांप्रमाणे झुडपेही ठरताहेत धोकादायक !

Like weak bridges, bushes are also becoming dangerous : सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एका मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का ?

Yavatmal : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात ५५ पर्यटक वाहून गेले तर चार जण ठार झाले. ज्याप्रमाणे कमकुवत पूल धोकादायक ठरत आहेत, त्याचप्रमाणे रस्त्यांच्या बाजुंना वाढलेली झुपहेही अपघातांना आमंत्रण देत आहेत. यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्याच्या झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्लीचे सरपंच हितेश ऊर्फ छोटू राऊत यांनी तक्रार केली आहे.

झरीजामणी तालुक्यासह वणी शहर व ग्रामीण भागांतील काही मुख्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी वाढलेली झुडपे अपघातांचे कारण ठरत आहे. वळणाच्या रस्त्यांवर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. यामुळे बरेच अपघात आतापर्यंत झालेले आहेत. झरी जामणी – वणी, वणी – मुकुटबन, नांदेपेरा, राजूर, घुग्गूस आणि यवतमाळला जोडणाऱ्या बऱ्याच मुख्य मार्गांवर झुडपांचा धोका वाढला असल्याचे सरपंच राऊत यांनी म्हटले आहे.

MLA Vinod Agrawal : डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. पावसाच्या दिवसांत रस्त्यांच्या दुतर्फा झाडे – झुडपे झपाट्याने वाढत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. रात्रीच्या वेळी तर या झुडपांमुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता दुपटीने वाढते. दुचाकी वाहनचालकांसाठी तर ही झुडपे अधिकच जिवघेणी ठरत आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी ही झाडे, झुडपे तोडण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. पण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

Sudhir Mungantiwar : ‘ठेंगणें’नी ठेवला विनंतीचा मान, अन् मुनगंटीवारांनी केले त्यांना ‘आभाळ ठेंगणे’

रस्ता सुरक्षेसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. पण आता लोकांनी तक्रार करूनही यवतमाळ जिल्ह्यातील या रस्त्यांची सुरक्षा केली जात नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभाग एका मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का, असा सवाल सरपंच छोटू राऊत यांनी केला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे तात्काळ कापली गेली नाही आणि अपघात झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल, इशाराही सरपंच राऊत यांनी दिला आहे.