Shivsena is a party of workers, only those who work will move forward : उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; यवतमाळवासीयांचे मानले आभार
Yavatmal शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे जो काम करेल तोच पुढे जाईल. काहीजण कार्यकर्त्यांना कसपटासमान समजायचे. पण कोण गद्दार कोण खुद्दारा याचा हिशेब जनतेने केला आहे. या महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा सरकार आणण्याचे काम केले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यवतमाळमधील शेतकऱ्यांसाठी माहायुती सरकारने १००० कोटी आणि पोहरादेवी देवस्थान विकासासाठी ७५० कोटींचा निधी दिली. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. म्हणूनच लोकांनी महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे शिंदे यांनी यवतमाळवासीयांचे आभार मानले. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती.
Prahar Teachers Association : आमदार-खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?
लोकांमध्ये जा, लोकांशी बोला, संवाद साधा निर्णय घ्या, असे निर्देश शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दिले आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून पाच कोटी नागरिकांना फायदा झाला. एकाच छताखाली अनेक योजनांचे लाभ लोकांना त्यांच्या दारात जाऊन दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन No reason on the spot decision अशा प्रकारे काम करणारे सरकार आहे. ज्यांनी प्रत्येक कामात रिझन दिले त्यांचा सिझन निवडणुकीत जनतेने संपवला, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
Vijaya Agrawal on Sajid Khan Pathan : वक्फ सुधारणा विधेयकावर दिशाभूल नको
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेऊन उबाठाने बाळसाहेबांच्या हिंदुत्वाला कलंक लावण्याचे काम केले. २०१९ ला स्वत:च्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली होती. आता वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करुन दुप्पट गद्दारी केली, अशी खरमरीत टीका शिंदे यांनी उबाठावर केली.