Breaking

Development of Akola : अकोल्याचा आक्रोश : नेता आहे, पण लढणारा नाही!

Leaders fail to take initiative for development works : विमानतळ, रेल्वे, रस्ते असूनही विकास शून्यावर; जबाबदार कोण?

Akola पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि वाहतूक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असूनही विकासाच्या बाबतीत मात्र मागासलेलाच राहिला आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आणि अगदी विमानतळाची सुविधा असूनही या जिल्ह्याचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता झाला आहे. याला कारणीभूत कोण? असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे.

अकोल्याला भक्कम राजकीय नेतृत्व लाभलेच नाही, हे या परिस्थितीचे मूळ कारण मानले जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी थेट नेत्यांना जाब विचारणारा, दबाव निर्माण करणारा नेता आजतागायत उभा राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींमध्ये विकासाची दृष्टी नाही, आणि लोकांच्या समस्या मांडण्याचे धाडसही नाही, ही कटू वास्तव परिस्थिती आहे.

Amravati District : सरपंचांना ‘अविश्वासविरोधी’ कवच; विरोधकांची डोकेदुखी वाढणार

अकोल्यात प्रकाश भारसाकळे आणि हरीश पिंपळे यांसारखे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत, हेच जनतेच्या दुर्दैवाचे प्रतीक असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. या नेत्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काही ठोस कार्य केले का, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील विमानतळ अनेक वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत आहे. अमरावतीतून उड्डाण सुरू होत असतानाच अकोला मात्र वंचित राहिला. जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. एकेकाळी भरभराटलेले उद्योग आज ठप्प आहेत. त्यातही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.

Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !

प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यासाठी योजना, प्रकल्प आणि मोठ्या घोषणांचा मारा होतो. मात्र निवडून आल्यानंतर त्या नेत्यांनी जिल्ह्यासाठी किती वेळा संसद किंवा विधानसभेत आवाज उठवला? किती निधी आणला? किती योजना प्रत्यक्षात उतरवल्या? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.