Breaking

Hasan Mushrif : सामूहिक प्रयत्नांतूनच वाशिमचा विकास शक्य !

Development of Washim is possible only through collective efforts : आरोग्य, शिक्षण, शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती

Washim ‘आकांक्षित जिल्हा’ ही वाशिमची ओळख पुसायची आहे. जिल्ह्याला प्रगतिशीलतेच्या मार्गावर न्यायचे आहे. मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच वाशिमचा विकास शक्य आहे. असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.

वाशिम येथे एका कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Kanyadan Scheme : दोन वर्षांत एकही सामूहिक विवाह सोहळा नाही !

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण, आणि शेती क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालय मागील चार महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ओपीडी सेवांमध्ये दीडपट वाढ झाली आहे. गरोदर माता व बालकांचे १००% लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

शेती क्षेत्रात, २०२४-२५ हंगामासाठी १.२४ लाख शेतकऱ्यांना १,२२७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. फळबाग लागवडीसाठी ८१२ लाभार्थ्यांना आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत २१० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे.

Ashok Uike : आदिवासींच्या श्रद्धास्थानी सांस्कृतिक भवन

जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ७८५ हेक्टर क्षेत्रावर ८१२ लाभार्थ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्यात आला. तसेच भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर २१० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभदेण्यात आला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवेत जिल्हा रूग्णालय मागील ४ महिन्यांपासून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सन २४ २५ या हंगामासाठी १ लभ ३८ हजार १५ शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते या उद्दिष्टाच्या अनुषगाने, दोन्ही हंगामांमध्ये एकूण १ लक्ष २४ हजार ६६० शेतकऱ्यांना १ हजार २२७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.