Breaking

Devendra Fadanvis : मराठी भाषा वापरली गेली पाहिजे, पण कायदा हातात घेणे चुकीचे !

Chief Minister Devendra Fadnavis said that Marathi language should be used : महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे

Nagpur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा वापरण्याचा आग्रह केला जात आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे, असा आग्रह असणे हे चुकीचे नाही. मात्र यासाठी कायदा हातात घेणे हे पूर्णतः चुकीचं होईल. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेणार नाही, ही माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात आज (३१ मार्च) मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिक्षणाचे भारतीयीकरण होत आहे. इंग्रजांनी शिक्षणात बदल केला. आपल्या देशाला गुलाम बनवण्यासाठीची शिक्षण पद्धती सुरू केली. जोपर्यंत येथील शिक्षण पद्धतीला आपण बदलणार नाही, तोपर्यंत भारतावर आपण राज्य करू शकणार नाही, ही त्यांची धारणा होती. याचा अर्थ त्यावेळी जी शिक्षण पद्धती आली होती, ती भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी आली होती. त्या शिक्षण पद्धतीत बदल करून त्याचं भारतीयीकरण होत असेल तर यामुळे कोणाला दुःख होण्याचे कारण नाही. जो राष्ट्रभक्त व्यक्ती असेल तो असंच म्हणेल की याचं भारतीयीकरण व्हायला हवं. सोनिया गांधी यांनी याची पूर्ण माहिती घ्यावी आणि भारतीयीकरणाला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे.

Devendra Fadanvis : राज ठाकरेंनी सुचवलेल्या मुद्द्यांवर विचार करू !

महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता काही मिशन आम्ही हातात घेतले आहे. ही तात्काळ स्वरूपात होणारी कामे नाही. हा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि थोडा वेळ खाणारा खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र हा केलाच गेला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आहे. यावेळी आपला कुंभमेळावा होईल. त्यावेळी पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील. त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल, हा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

HSRP Number Plate : ३० जूनपर्यंत मुदत, तारीख मिळतेय जुलैची!

विजेचे दर पुढील पाच वर्षात दरवर्षी आम्ही कमी करणार, असं मी विधानसभेत बोललो. आमची पिटीशन नियमक मंडळांनी स्वीकारली आहे. काही कॅल्क्युलेशन संदर्भात त्यांचे आणि आमचे मतभेद आहेत. हे मतभेद दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज मिळेल आणि आपली कंपनीदेखील 70 ते 80 हजार कोटी डेट फ्रीदेखील करू शकू. बिडमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल विचारले असता, आता बीडमध्ये शांतता आहे. कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सारखीच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.