Devendra Fadnavis said that another special flight has been arranged : राज्य सरकार करणार विशेष विमानांचा खर्च
Mumbai : पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटक ठार, तर इतर काही जखमी झाले. या हल्ल्यानंतर जम्मू – काश्मीरमधील खोऱ्यांत हाहाकार उडाला. प्रत्येक पर्यटक परत जाण्यासाठी धडपड करू लागला. इकडे महाराष्ट्र सरकारनेही तातडीने हालचाली करत विशेष विमानांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आज आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झालेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वरून ही माहिती दिली. X वर मुख्यमंत्र्यांनी लिहीले की, ‘काश्मीरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था जाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत.
Jammu – Kashmir Attack : जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होणार दुरगामी परिणाम !
इंडिगोचे विमान ८३ पर्यंटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.’
Jammu – Kashmir Attack : नागपुरातील दोनशेवर पर्यटक अद्यापही अडकून, पण सुरक्षीत !
मंगळवारच्या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या पर्यटकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून धीर दिला जात आहे. त्यांना आणण्याचीही व्यवस्था केली जात आहे. तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांनी घाबरून जाऊ नये आणि सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षीत परत आणण्यास सरकार कटीबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.