Breaking

Disha Salian Death Case : गायकवाड, मिटकरी यांच्याकडून आदित्य ठाकरेंचे समर्थन!

 

Gaikwad, Mitkari support Aditya Thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा

Akola महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने खळबळ माजवली आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीच्या दोन आमदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांची पाठराखण केल्याने नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) Shivsena Eknath Shinde बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) NCP Ajit Pawar विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांबाबत प्रश्न उपस्थित केले.

Akola MLA Sajid Khan Pathan : साजिद खान म्हणाले, ‘राजराजेश्वर मंदिराचा विकास करा’!

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना, मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिशा सालियन प्रकरणात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सीआयडीच्या CID जुन्या संदर्भावर आधारित वक्तव्य केले होते. मात्र, नंतर अधिक माहिती घेतल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे प्रारंभी अपूर्ण माहितीच्या आधारे बोललो, मात्र नंतर आवश्यक ती दुरुस्ती केली.”

Bill Gates : बिल गेट्स करणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत !

आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, “दिशा सालियन यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, ही आमची इच्छा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत औरंगजेबाची कबर किंवा दिशा सालियन यांसारखे मुद्दे महाराष्ट्रासमोरील प्राथमिक प्रश्न नाहीत. अधिवेशनाच्या उर्वरित काळात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी.’

या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकांमध्ये फटाके उडू लागले असल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिंदेसेनेची भूमिका स्पष्ट असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे याचा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.