Breaking

Dr. P. Anbalagan IAS : उद्योगांच्या समस्या जिल्हास्तरावरच सोडविणार !

The problems of the industries will be solved at the district level : उद्योग सचिवांचा दावा; ‘उद्योग समस्यांचे निराकरण’वर परिसंवाद

Nagpur : उद्योग स्थापन करणे आणि त्यानंतर त्याच्याशी निगडीत विविध समस्यांवर काम करणे या दोन्ही बाबी वेळकाढू आहेत. अनेकदा तर लहानशा समस्येच्या निराकरणासाठी थेट मुंबई गाठावी लागते. अशा प्रकारांमुळे उद्योजकांमध्ये सरकारबाबत नकारात्मकता निर्माण होते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारकडून उद्योगांच्या समस्या जिल्हास्तरावरच सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अनबलगन यांनी याबाबत नागपुरात संकेत दिले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या ‘ॲडव्हांटेज विदर्भ’मध्ये ‘उद्योग समस्यांचे निराकरण’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. त्यांनी विदर्भातील उद्योजक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कार्यक्रमाला एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, एमआयए इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष पी. मोहन, बीएमएचे डॉ. किशोर मालवीय, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष अलोक पाहुणे उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुनगंटीवार पुन्हा मैदानात 

उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी राज्य सरकारने ‘मैत्री २.०’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकरादांना अधिक सोपी, जलद, पारदर्शक सेवा मिळत आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या उद्योग विकासासाठी राज्याने ‘मैत्री’चा हात पुढे केला आहे. उद्योगाच्या समस्या जिल्हास्तरावरच सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे डॉ. पी. अनबलगन यांनी सांगितले.

Gondia Zilla Parishad : विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व !

डॉ. पी. अनबलगन म्हणाले, विदर्भात खूप क्षमता आहे. हे दशक विदर्भाच्या औद्योगिक विकासाचे आहे. विदर्भात पारंपरिक उद्योगांसोबतच नवनवे उद्योग आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत. सरकारकडून त्यावर विशेष भर देण्यात येत आहे. उद्योग करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण जिल्हा पातळीवरच व्हावे आणि गावस्तरावर उद्योजक तयार व्हावेत, असे सरकारचे प्रयत्न आहेत. चर्चासत्रात उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या.