Breaking

Dr. Pankaj Bhoyar : समाज छोटा असला तरी मोठे कार्य करू शकतो

 

Even if a community is small, it can do great work : पालकमंत्री डॉ. भोयर यांनी साधला संवाद

Wardha सुतार व लोहार समाज संख्येने लहान असला तरी या समाजात एकोपा आहे. यामुळेच दोन्ही समाज चांगले कार्य करीत आहे. समाजाने हा ऐकोपा असाच कायम ठेवावा. समाज भवन व मंदिर परिसर सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी वृक्षोरापण करून परिसर हिरवागार करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने समाजभवनाची निर्मिती करण्यात आली. या भवनाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. लोहार समाजाच्या वतीने रिंगरोड येथील समाज भवन परिसरात प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष कुचेवार, पृथ्वीराज शिंदे, गौरव गावंडे, राजू कळसाईत, मनोज परघन, लोहार समाजाचे नेते सदाशिव हिवलेकर, विद्या कळसाईत, दामोदर सेलवट, श्रीकृष्ण प्रधान, गणपत प्रधान, प्रकाश बरगड आदी उपस्थित होते.

Dr. Pankaj Bhoyar: आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न

सुतार समाजाच्या वतीने हनुमान गड येथील प्रभू विश्वकर्मा मंदिर व समाज भवनातील कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष अरुण इंगळकर, माजी पं.स. सदस्य फारुख शेख, मयूर महाराज दरणे, प्रवीण चोरे, ग्रा.पं. सदस्य प्रदीप रौंदळे, वैशाली नोहाटे, गिरीश कांबळे, रवी शेंडे, शरदराव चांदूरकर उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण इंगळकर यांनी केले, तर संचालन शरद चांदूरकर यांनी केले.

लोहार समाज संख्येने कमी असल्याने समाजाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत होते. मात्र, डॉ. पंकज भोयर यांनी समाजाला सतत सहकार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे समाज भवन परिसरात सभागृहाचे निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा लाभ समाजाला होणार आहे. त्यांच्या पुढाकारातून समाजाच्या अन्य समस्या सोडविल्या जातील, असा विश्वास आहे, असे समाज बांधवांनी स्पष्ट केले.

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्री पोहोचले परीक्षा केंद्रावर

डॉ. पंकज भोयर यांनी सुतार समाज भवन परिसरात सभागृहाची निर्मिती केल्यामुळे हक्काचे सभागृह मिळाले आहे. समाजातील गरीब कुटुंबातील विवाह समारोह व अन्य कार्यक्रम याठिकाणी होऊ शकतात, तसेच समाजाच्या प्रगतीसाठी देखील सभागृहाचा वापर होणार आहे. ना. भोयर यांनी सतत सहकार्य केले आहे, असे समाज बांधवांनी सांगितले.