Solve the problems of farmers on priority basis: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कृषी विभागाला सूचना
WARDHA भारत हा कृषिप्रधान देश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागावर आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा, अश्या सूचना राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हा क्रीडासंकुल, वर्धा येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ‘आत्मा’चे संचालक डॉ. नलिनी भोयर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण वर्षभर नागरिकांचे प्रश्न निघाली काढताना आपल्याला स्वतःसाठीसुद्धा वेळ मिळावा. यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या भेटीगाठी होतात. या भेटींदरम्यान कामकाजाबाबत चर्चा करून सर्वसामान्यांचे अधिकाधिक प्रश्न कसे निकाली काढता येईल यासाठी प्रयत्न करा, असं ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त जिल्हा हा डाग आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुसून काढायचा आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
शासनाच्या १०० पेक्षा अधिक योजना राबविण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला कामाच्या स्वरूपात न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध पोशाख परिधान करून पथसंचलनाच्या माध्यमातून राज्याच्या संस्कृतीचे प्रदर्शन दाखविले.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या
‘आत्मा’ कार्यालयाचे पंकज सावरकर व मोईन शेख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले; तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी उपस्थितांचे आभार मानले.