Breaking

Eknath Shinde : कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही!

No matter how many crises come, no one can stop Shiv Sena said Eknath Shinde : ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम

Thane – Mumbai : अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस रात्रं काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेकडून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठ पद मिळालं, मानसन्मान मिळाला पण काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचले नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला.

Vijay Wadettiwar : थोडी तरी लाज बाळगा रे..!

एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा माणूस आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार, असे शिंदे म्हणाले. कोविड होता तेव्हा काहीजण घरात ‘हात धुवत’ बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता पीपीई किट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले. अडीच वर्षांतील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली, असे ते म्हणाले.

ठाण्यात आपण वाढलो. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलतंय. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना रक्ताचं पाणी अन् हाडाची काडं केली. या काळात इर्शाळगडावरील बचाव कार्य, कोल्हापूरचा पूर, चिपळूणमधील पूर आणि बचाव कार्याच्या आठवणी शिंदे यांनी यावेळी सांगितल्या. इर्शाळवाडीचे पुनर्वसन केले आणि तेथील नागरिकांना पक्की घरे दिली. व्यासपीठावरील गर्दी आणि समोर बसलेले कार्यकर्ते हीच खरी आपली दौलत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी या उपक्रमातून आपण हे करुन दाखवले.

Wardha Police : पोलिसांचे ‘खबरी’ गेले कुठे?

राज्यातील पाच कोटी लोकांना फायदा झाला. दाखले, ड्रोन, ट्रॅक्टर, प़ॉवरटीलर, घराची चावी आपण लोकांना त्यांच्या दारी जाऊन सुपूर्द केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जे बोललो ते करुन दाखवले. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. कोट्यवधी बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना केलेले असंख्य फोन आणि कागदपत्रांवर केलेल्या स्वाक्षरीचां विचार केला तर आतापर्यंतचा नवा रेकॉर्ड ठरेल, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर होते. मात्र आपण उठाव केला आणि जनतेच्या मनातले सरकार आणले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना अडीच वर्षात मागच्या अडीच वर्षांची कमतरता भरुन काढलीच शिवाय पुढील १० वर्षांची पायाभरणी केली, अशी जनभावना आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्षात शिवसेनेत राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करत आहेत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. शिवसेना आणखी मजबूत झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘निगाहों मे मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे, हवाओं ने बहोत कोशिश की, मगर चिराग आंधीयों मे भी जलता रहा’, हा शेर बोलून दाखवला. ते पुढे म्हणाले की, आता कितीही संकटे आली तरीही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही.