The struggle for democratic values will continue : ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियानाचा चिखलीत शुभारंभ
Buldhana भारतीय संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व चिखलीचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती. ज्यामुळे संविधानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. आता सहा महिन्यांनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान सुरू केले आहे. चिखलीतील हा संविधान जागर कार्यक्रम राज्यासाठी पथदर्शी ठरला, असेही बोंद्रे यांनी सांगितले.
Mahayuti Government : सरपंचांचा ‘मान’ वाढला, ‘धन’ कधी मिळणार?
चिखली येथे २९ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांना अभिवादन करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले, “काँग्रेस पक्ष हा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मजबूत होत आहे, तर दुसरीकडे संधीसाधू राजकारण्यांमुळे इतर पक्ष अडचणीत येत आहेत.”
चिखली मतदारसंघात काँग्रेस पक्षाने सलग दोन निवडणुकांमध्ये कडवी लढत दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास बोंद्रे यांनी व्यक्त केला. महायुतीने संपूर्ण शक्ती लावूनही काँग्रेसचा पराभव केवळ १,००० ते १,५०० मतांनी झाला. काँग्रेस संपवणारे संपले, पण काँग्रेस कायम आहे. आगामी काळात आम्ही शेतकरी, बेरोजगार आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहू, असे राहुल बोंद्रे यांनी म्हणाले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.