Breaking

Ex-MLA Sanjay Raimulkar : काँग्रेस नेत्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप

Defeated former MLAs laid the foundation stone for development works : रायमुलकर यांनी केलेली उद्घाटने बेकायदेशीर असल्याचा दावा

Buldhana ‘निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचा कायदेशीर अधिकार नसतो. मात्र मेहकर-लोणार मतदारसंघात अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सदस्य आणि मेहकर विधानसभा पक्षनेते अ‍ॅड. अनंत वानखेडे यांनी केला आहे. या आरोपांमुळे आता नवा वाद उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

“माजी आमदार संजय रायमुलकर यांनी १५ वर्षांच्या कारकिर्दीत मोठी विकासकामे केली नाहीत. आता मात्र, ते निधी आणल्याचा दावा करत बेकायदेशीरपणे उद्घाटने आणि भूमिपूजन करत आहेत,” असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला. “रायमुलकर यांनी सत्ता असताना फक्त पोकळ घोषणा आणि कोरडी आश्वासने दिली. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात उद्योगधंदे आले नाहीत. एमआयडीसीची निर्मिती झाली नाही. रस्ते आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधा सुधारण्यात अपयश आले. त्यामुळे जनतेने त्यांना घरी बसवले.”

Shinde Shivsena Vijay Ambhore : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करा

परंतु, आता “त्यांनी स्वतःच निधी आणला” असा दावा करून विविध विकासकामांचे बेकायदेशीर उद्घाटन आणि भूमिपूजन सुरू आहे. वानखेडे यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही विकास निधीवर माजी आमदाराचा हक्क नसतो. तो निधी प्रशासकीय प्रक्रियेद्वारे मंजूर होतो आणि त्याचा उद्घाटनाचा अधिकार विद्यमान आमदारांकडे असतो.”

“उद्घाटनाच्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असते. मात्र, रायमुलकर कोणतेही नियम न पाळता, स्वतः भूमिपूजन करत आहेत. हे सरळसरळ विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप वानखेडे यांनी केला.

“एकदा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना निधी मिळत नाही. ते केवळ सत्तेच्या हव्यासापोटी जनतेची दिशाभूल करत आहेत,” असा आरोप करत “रायमुलकर यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी आणि विद्यमान आमदारांच्या कामात हस्तक्षेप करू नये,” असे वानखेडे यांनी परखड शब्दांत सांगितले.

Vidarbha Farmers : सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबवा; अन्यथा आंदोलन

“लोकशाही प्रक्रियेत जनतेनेच रायमुलकर यांना घरी पाठवले. त्यांनी हे वास्तव स्वीकारून बेकायदेशीर कृत्ये थांबवावीत,” असे मत अ‍ॅड. वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.