Breaking

Gogawale ON Rashmi Thackeray : शिवसेनेच्या फुटीमागे ठाकरे ‘वहिणीं’चा हात !

Gogawale dropped a bomb, creating a stir in politics: गोगावलेंनी टाकला बॉम्ब, पेडणेकरांचे प्रत्युत्तर, राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai : शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार भरत गोगावले यांनी मुख्य शिवसेना फुटीच्या कारणाची पुन्हा उजळणी केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला आहे. या फुटीमागे रश्मी ठाकरे वहिनींचे हात असल्याचा बॉम्बगोळा टाकला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेते उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत फूट हा आजही चर्चेचा विषय आहे. या फुटीमागील सल काही केल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्या वेदना आपोआपच बाहेर पडतात. आता शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा उजळणी केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला असून फुटीमागे रश्मी ठाकरे वहिनींचे हात असल्याचे म्हणले आहे.

Pandharpur Darshan : अवघ्या एक तासात होणार आता विठुरायाचे दर्शन

आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे होते, तसेच आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे पत्नीचे ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे.

आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असे अनुभव सांगत गोगावले यांनी मन मोकळे केले.

Shahrukh Encounter : पुण्यातील सराईत गुंड शाहरूखचा एन्काऊंटरमध्ये सोलापूरात खात्मा

आम्ही आत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षच चिन्ह आम्हाला मिळाला आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोला गोगावले यांनी लगावला.

भरत गोगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. आता यांना साक्षात्कार होत असतील तर मला वाटतं आता यांचा पॉइंटच चुकला आहे. जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे अधोगतीला पोहचण्याची लक्षण त्यांची दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ज्या पद्धत्तीने पती- पत्नी, माँ ज्या पद्धत्तीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत. रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा, संस्कार आहेत तेच रश्मी वहिनी करत आहेत. जेव्हा साहेब ओरडले तर हीच लोक वहिनींच्या माध्यमातून मध्यस्थी करायचे. आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट म्हणून जर काढत असतील, तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुध्दीची अधोगती बघावी, असा घणाघात त्यांनी घातला.

आदित्यने मंत्री होऊ नये असे का वाटते. वयाच्या 14 व्या वर्षांपासून सिनेट च्या निवडणुका, पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्यातील झलक बघून, हीच लोक त्यांना मंत्री करायचे म्हणत होते. आता निष्ठावान मधला बडगा कसा असतो, किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असा जिव्हारी लागणारा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला.

School ID scam : दोषी शिक्षकांवर कारवाई करा, पण इतरांचा पगार का थांबवला ?

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात जी भेट झाली, ती एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही, त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतात, किंवा राज्यात, देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट घेऊन बोलले असावेत. जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.