Controversy over anti-encroachment action in Amgaon : प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेने नागरिक संतप्त; परिपत्रकाची खिल्ली
Gondia आमगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये झालेल्या हाणामारीनंतर प्रशासनाने तातडीने अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मात्र, ही कारवाई फक्त दोन विक्रेत्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली. त्याच परिसरातील इतर अतिक्रमण कायम ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर काही तासांतच सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त दोन फळ विक्रेत्यांची दुकाने हटवली. मात्र, त्याच ठिकाणी असलेले इतर अतिक्रमणधारक सुस्थितीत राहिले. कायदा सर्वांसाठी समान असताना काहींवर कठोर कारवाई आणि काहींना अभय देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे प्रशासनाचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
Gondia ZP : गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी ‘गायब’, नागरिक वैतागले !
प्रशासनाने हाणामारीनंतर 24 तासांत सर्व अतिक्रमण हटवण्याचे परिपत्रक जाहीर केले. मात्र, 24 तास उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. परिपत्रक फक्त कागदावरच राहिले आहे. प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झाली नाही. नागरिक आता प्रशासनाच्या या निष्क्रीय भूमिकेविरोधात आक्रमक झाले आहेत.
अनेक मोठ्या व्यावसायिकांचे अनधिकृत दुकान आणि हॉटेल्स रस्त्याच्या कडेला उभारलेले आहेत. मात्र, प्रशासनाने त्यांच्यावर फक्त नालीच्या बाहेर दुकान लावू नये असे सांगितले. प्रशासनाची कारवाई फक्त गरीब आणि लहान विक्रेत्यांवर होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
Dr. Pankaj Bhoyar : लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची
नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. परिपत्रक काढूनही कारवाई न झाल्याने अनेक स्थानिकांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी रस्ते व्यापून मोठे अतिक्रमण झाले आहे. असे असताना फक्त भांडण झालेल्या विक्रेत्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आता सामाजिक संघटना आणि नागरिकांनी यावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.