Breaking

Guardian minister Chandrashekhar : नव्या आमदारांना १.८० कोटींचा विकास निधी मार्चपर्यंत!

1.80 crore development fund for new MLAs till March : 31 जानेवारीला पालकमंत्र्यांची आढावा बैठक

Amravati विधानसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या पाच आमदारांना स्थानिक विकास कामांसाठी मार्च २०२५ पर्यंत १.८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय तीन आमदार पुन्हा निवडून आले आहेत. त्यांना देखील त्यांच्या आधीच्या कार्यकाळातील निधी पूर्ण झाल्यामुळे तेवढाच निधी मिळणार आहे. ३१ जानेवारी रोजी पालकमंत्री जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याने जिल्हा नियोजन विभाग आराखड्याच्या तयारीत व्यस्त आहे.

राजेश वानखडे (तिवसा), उमेश यावलकर (मोर्शी-वरुड), प्रवीण तायडे (अचलपूर), केवळराम काळे (मेळघाट) आणि गजानन लवटे (दर्यापूर) हे पाच नवे आमदार निवडून आले आहेत. दुसरीकडे प्रताप अडसड (धामणगाव), रवी राणा (बडनेरा) आणि सुलभा खोडके (अमरावती) हे पुन्हा निवडून आले आहेत. पुन्हा निवडून आलेल्या आमदारांना ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध राहणार आहे. मात्र, पाच नव्या आमदारांच्या निधीमध्ये त्यांच्या मतदारसंघातील मागील आमदारांना दिलेल्या निधीमुळे कपात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मार्चअखेरपर्यंत हात राखून खर्च करावा लागणार आहे.

Accident in Gondia : बोलेरोची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकले ठार

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ३१ जानेवारीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समिती पदाधिकारी विविध विकासकामांच्या शिफारसी करतील. त्यानंतर राज्यस्तरीय बैठकीत याला मान्यता मिळाली तर जिल्ह्यासाठी वाढीव तरतूद शक्य आहे. जिल्ह्याच्या प्राथमिक वार्षिक आराखड्यात २०२५-२६ साठी एकूण ४१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य आणि रस्ते-पूल या क्षेत्रांसाठी सर्वाधिक निधी वितरित केला आहे.

Ashok Uike : आदिवासींच्या श्रद्धास्थानी सांस्कृतिक भवन

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी आवश्यक तरतूद करण्यासाठी वित्तमंत्री अजित पवार ३ फेब्रुवारी रोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जातील. जिल्ह्याच्या प्राथमिक आराखड्यात वाढ करण्याची शक्यता आहे. ही बैठक अमरावती येथील नियोजन भवनात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शासकीय विभागांना दिलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होईल. जिल्ह्याच्या प्राथमिक वार्षिक आराखड्याला राज्य बैठकीत मान्यता मिळे, असे जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के यांनी सांगितले.