Breaking

Harshawardhan Sapkal : राज्य टिकवण्यासाठी दंगली, पण आपला मार्ग सद्‍भावनेचा !

 

Congress President Harshawardhan Sapkal said riots are to save the state, but our path is of goodwill : काही लोक सत्तेसाठी भावाभावांत, जातीपातींमध्ये भांडणे लावत आहेत

Nagpur : नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते. पण पोलीस फोन उचलत नव्हते, असे भाजपा आमदारच तेव्हा सांगत होते. यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. पण आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

नागपुरात आज (१६ एप्रिल) काँग्रेस पक्षाने सद्भावना यात्रा काढली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावांत, जातीपातींमध्ये भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मांत, भावाभावांत भांडणे लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Harshawardhan Sapkal : नवीन मित्र जोडण्याची गरज वाटली, म्हणजेच पायाखालची वाळू सरकली !

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो. पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत.

Harshawardhan Sapkal : भाजपने मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान करावे

नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले. त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार, असा उल्लेख केला, हे लाजीरवाणे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांचीही भाषणे झाली.