Work to earn money by implementing big projects begins : ईव्हेंटबाजीमध्ये सरकार मशगूल, मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
Nagpur : एखादा मोठा प्रकल्प म्हणजे जास्त पैसा. जेथे पैसा जास्त खर्च होईल, तेथे भ्रष्टाचारही मोठा होईल आणि सरकारला जास्त पैसा खाता येईल. आताही मोठ्या प्रकल्पांना पैसा देऊन खाण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईत झालेल्या लोकलच्या अपघातावरूनही सपकाळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. यासंदर्भात ते म्हणाले, मुंबईतील लोकलचा अपघात अत्यंत दुःखद आहे. सरकार जाहिरातबाजीत व्यस्त आहे. लुटो और बाटो, हे सरकारचे धोरण आहे. भ्रष्टाचाराचा कॉरीडोअर सुरू झाला आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे. मुंबईच्या मुलभूत सुविधांकडे सरकारचे लक्ष नाही.
Bacchu Kadu : शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला
मुंबई लोकल अपघातातील मृतांच्या परिवारांना प्रत्येक २५ लाख रुपयांची मदत जाहिर करावी आणि मृतांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. कारण या अपघाताला सरकारच जबाबदार आहे. आता मृतांच्या कुटुंबांची जबाबदारी सरकारची आहे. याशिवाय लोकल रेल्वेमध्ये सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. डबे आणि गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. आता प्रवासाही अडचणीत आले आहेत. सरकार मात्र अदानीला जमिनी देण्यात गुंग आहे, असाही आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Alcohol prices increased : राज्य सरकार उतरवणार तळीरामांची झिंग ?
रेल्वेचे दरवाजे ऑटोमॅटीक बंद करण्याचा प्रकल्प राबवण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र ती अंमलात आणली नाही. परिणामी मुंबईत लोकलचा अपघात झाला. या घटनेनंतर खरं तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा आणि सरकारने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.