Imbalance in development of higher education in Vidarbha : राष्ट्रीय शैक्षणिक संस्था नागपुरात; अमरावती विभागात केवळ एकच संस्था, तीही भाडेतत्त्वावर
Akola विदर्भात नागपूर व अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग आहे. भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्येच्या दृष्टीने दोन्ही विभाग जवळपास सारखे आहेत. मात्र उच्च शिक्षणाच्या विकासात नागपूर विभागाने मोठी झेप घेतली असताना, अमरावती विभाग अद्यापही उपेक्षेच्या छायेत आहे.
विदर्भात एकूण सहा सार्वजनिक विद्यापीठे कार्यरत असून, यामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व अकोला या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ कार्यरत आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या संस्था जसे की आयआयएम, आयआयआयटी, व्हिएनआयटी, एम्स, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, या सर्व संस्था नागपूर विभागात, विशेषतः नागपूर शहरात केंद्रित आहेत.
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची अकोला मनपा आयुक्तांना दहा दिवसांची मुदत
अमरावती विभागात केवळ ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC)’ ही एकमेव राष्ट्रीय संस्था कार्यरत आहे. ती सध्या अमरावती विद्यापीठाच्या प्रांगणात भाडेतत्त्वावर चालते असून, बडनेरा परिसरात १५ एकर जागा उपलब्ध असतानाही अद्याप स्वतःची इमारत उभी राहिलेली नाही. याऐवजी ही संस्था नागपूर येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्नही काही राजकीय मंडळींनी केला होता.
Mahavitaran Akola : महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी भर पावसात केली दुरुस्ती!
१९६०च्या दशकात अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विदर्भवासीयांना मोठा लढा द्यावा लागला होता. राज्य सरकारने सुरुवातीला अकोला येथे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर हा निर्णय बदलून राहुरी येथे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला विरोध करताना १७ ऑगस्ट १९६७ रोजी झालेल्या आंदोलनात ९ विद्यार्थ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. अखेर १९६९ मध्ये अकोला येथे विद्यापीठ स्थापन झाले.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्याचाही प्रयत्न झाला होता, मात्र तो सध्या तरी थांबलेला आहे. पूर्व व पश्चिम विदर्भातील असमतोल वाढत्या प्रमाणात ठळक होत असून, नागपूर विभागात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमुळे नागपूर हे ‘शैक्षणिक हब’ म्हणून उदयास येत आहे. दुसरीकडे, अमरावती विभागात सिंचनाचा अभाव, अपूर्ण औद्योगिकीकरण व माहिती तंत्रज्ञानाचा मर्यादित विस्तार यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधीच नाहीत. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात हवाई सेवा, विशेष औद्योगिक सवलती, व राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होऊन स्थानिक पातळीवर रोजगार वाढण्यास मदत होईल.