Water tax arrears of Rs.6 crore on the municipality : पाण्याच्या कराचे पावणेसहा कोटी रुपये थकित
Wardha सरकारच्याच दोन यंत्रणा एकमेकांच्या विरोधात उभ्या होणे नवे नाही. पण सरकारच्या एका विभागाने दुसऱ्या यंत्रणेची कोंडी करण्याचा प्रकार दुर्मिळ आहे. वर्धा जिल्ह्याचा पाटबंधारे विभाग आता पालिकेची कोंडी करणार आहे. पालिकेकडे पाण्याच्या कराचे तब्बल पावणेसहा कोटी रुपये थकित असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहराला धाम धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिले जाते. असे असताना गत तीन वर्षांपासून पालिकेने पाटबंधारे विभागाला पाण्याचा करच अदा केलेला नाही. पाण्याच्या कराची ही रक्कम तब्बल ५ कोटी ७३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. थकीत रकमेचा वाढता आकडा लक्षात घेता पाटबंधारे विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.
Crime in Amravati : अमरावतीत युवकाची हत्या; शहरात तणावाचे वातावरण!
जिल्ह्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पाटबंधारे विभागाने तलाव, धरणाची निर्मिती केली. यातून मोठ्या शहरासह ग्रामपंचायत तसेच जिल्ह्यातील उद्योग कारखाने मोठे प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र, असे असताना एकट्या वर्धा नगर पालिकेकडे तीन वर्षांपासून कराचा भरणा केला नाही.
शिवाय लघु उद्योगांसह, मोठ्या उद्योगांकडे लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आस्थापनांकडे थकबाकी असलेला आकडा २५ कोटी ३७ लाख ४० हजार रुपये एवढा आहे. या थकबाकीमुळे कालवे दुरुस्तीसह अन्य कामे रखडली आहेत. असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाकडे ८ मोठी, तर २० लहान जलाशये आहेत. यातून जिल्ह्यासह चंद्रपूर तालुक्यातील काही भागांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पोथरा प्रकल्पामधून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथील बिल्ट ग्राफीक पेपर मिल व राजुरा नगरपरिषदेला पाणी पाणीपुरवठा केला जातो.
मदन प्रकल्पामधून जामणी येथील मानस ॲग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सदर कंपनीने जीवन प्राधिकरणाचे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत १७ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये थकविले आहेत. पिंपरी मेघे व १३ गावे पाणीपुरवठा योजनांतर्गत धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.
Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!
तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वर्धा, व्यवस्थापन मध्य रेल्वे वर्धा, उत्तम व्हॅलू स्टील लिमिटेड, वर्धा, नगरपरिषद वर्धा, ग्रामपंचायत पवणार, ग्रामपंचायत आंजी, बोर अभयारण्यातील हॉटेल अरण्यक, विश्रामगृह बोर धरण, मत्स्य बीज केंद्र व एवोनिथ मेटॅलिक्स वर्धा यांना जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा केला जातो.