Breaking

Kashmir terrorist attack : ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा, अन्यथा जिथे असाल तेथेच ठोकू !

 

Eknath Shinde warns Immediately go to Pakistan, otherwise we will strike wherever you are : देशाच्या शत्रुने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला

Buldhana : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. पण आता सडेतोड उत्तर देण्याची तयारी प्रत्येक भारतीयाने केली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ताबडतोब निघून जावे. अन्यथा तुम्ही जेथे असाल, तेथे पोलिस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा दमदार इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

बुलढाणा येथे शिवसेनेची आभार सभा आज (२७ एप्रिल) पार पडली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी आमदार संजय रायमुलकर, आनंदराव अडसूळ, प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, पहलगाममध्ये झालेला हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. आता पाकिस्तानचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यांचे नामोनिशान मिटवण्याची वेळ आली आहे,

Terrorist attack in Pahalgam : भीती, चिंता आणि थरारक अनुभव!

दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांना बिळातून बाहेर काढू. ही देशभक्तीची लढाई आहे. देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक सैन्याच्या जनावासारखा लढेल. यापुढे भारतावर हल्ला करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. केंद्र सरकार त्यांचे काम करत आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. हा आरपारची लढाई आहे. आम्ही मतांच्या राजकारणासाठी शेपूट घालणारे नव्हे, तर घरात घुसून मारणारे सैनिक आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Terrorist attack in Pahalgam : या निर्णयाने पाकिस्तानी नागरिकांना दिलासा

आभार सभेसाठी बुलढाणावासीयांनी रणरणत्या उन्हात गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी जनतेचे कौतुक केले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने बुलढाणावासीयांच्या मनात देशभक्तीची मशाल पेटवली. पहलगाम येथील हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.