27 Sarpanchs will be elected directly from the people : संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायतींची मुदत संपणार
Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरपंच व अध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवड हा महायुती सरकारचा अजेंडा आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार हे जवळपास निश्चित आहे. संग्रामपूर तालुक्यातील २७ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे.
सरपंचपदाचे आरक्षण सुद्धा जाहीर झाले आहे. त्यामुळे २७ ग्रा.पं. मधे सरपंच पदासाठी ग्राम स्तरावर राजकीय हालचाली सुरू झाल्याचे संग्रामपूर तालुक्यातील राजकीय चित्र आहे. येत्या डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत पुढील प्रमाणे यात आवार आकोली काकणवाडा खु. वरवट बकाल बोडखा बावनबीर सोनाळा चांगेफळ खुर्द पळशी झाशी पळसोडा, टुणकी बु. तामगाव, निरोड, रुधाना, सगोडा, वसाळी, खिरोडा, उकळी बु कवठळ, वरवट खंडेराव, आलेवाडी, पिपरी, आडगाव, वानखेड, दुर्गादैत्य, लाडणापूर, कोदरी, पातुर्डा, खुर्द, या ग्रा. पं. चा समावेश आहे. या ग्रापंची मुदत या वैर्षाचे शेवटच्या महिन्यात संपणार आहे.
मुदतपूर्व निवडणूक झाल्यास याच डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ शकतात. म्हणूनच तर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या सर्व २७ ग्राप. मध्ये आता थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने आतापासूनच सरपंच पदासाठी राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
पूर्वी संपूर्ण गावातून सदस्य निवडल्यावर यातून सरपंच पदासाठी निवडणूक होत होती त्यामुळे सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होऊन घोडेबाजार भरत होता. पण आता सरपंच निवडण्याचा अधिकारच सामान्य जनतेला देणे हा महायुती सरकारचा अजेंडा आहे व हेच महायुतीचे सरकार सध्या सत्तेत आहे त्यामुळे जनतेतून सरपंच निवडल्या जाणार हे निश्चित आहे.
थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने सोनाळा वानखेड वर वट बकाल पातुर्डा पळशी झाशी यासह आठ ते दहा गावातील सरपंच पदाची निवडणूक मोठ्या अटीतटीत पार पडणार असल्याचे संकेत आहेत. सरपंच पदासाठी इच्छुकानी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे.