Mahavikas Aghadi in action mode : २२ जूनची बैठक ठरणार निर्णायक; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अनिश्चितता
Buldhana राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतश्या राजकीय हालचालही वाढल्या आहेत. महाविकास आघाडी सध्या ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. एकत्र लढतीसाठी समन्वय वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर २२ जून रोजी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटप, प्रचारनिती आणि स्थानिक आघाड्यांचे संकेत यावर निर्णय होण्याची शक्यता असून काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते व माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या जयश्री शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. आघाडीने एकत्र निवडणुका लढाव्यात, ही भूमिका शिंगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. मात्र, जिल्हा काँग्रेसची भूमिका अद्यापही औपचारिकरित्या स्पष्ट झालेली नाही.
AYUSH Ministry : आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हजारो महिलांवर उपासमारीची वेळ!
जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद निर्णायक मानली जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष नेमका काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून सकारात्मक संकेत देण्यात येत असले, तरी पक्षांतर्गत संभ्रम आणि नेतृत्वाची दिशाहीनता स्पष्टपणे जाणवत आहे.
काँग्रेसच्या धोरणात्मक अनिश्चिततेमुळे उद्धव ठाकरे गटातही संभ्रम आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव सेनेला पहिल्यांदाच स्थानिक निवडणुकांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागावाटप, प्रचारनिती आणि स्थानिक उमेदवार निवडीबाबत काँग्रेसची भूमिका ठराविक नसल्यास मतविभाजन होण्याची भीती शिवसेनेला आहे. रविवारी होणारी बैठक याबाबत काही स्पष्टता देईल, अशी अपेक्षा आहे.
Eknath Shinde Shiv Sena : मुंबईतील माजी नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, शिंदें गटात प्रवेश
बैठकांमध्ये ‘पुरोगामी महाराष्ट्र वाचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय संघर्ष आवश्यक आहे’ असा सूर उमटत असला, तरी तो कृतीत कधी आणि कसा उतरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी बैठक ही केवळ समन्वयासाठी न राहता निर्णायक निर्णय घेणारी ठरेल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.