Breaking

Local Body Elections : मतदान झाल्यावर उघडली का झोप?, भाजप नेत्यांचा सवाल

Why didn’t Congress object to voter growth before the elections? : निवडणुकीपूर्वीच मतदारवाढीवर आक्षेप घ्यायला हवा होता

Nagpur मतदारवाढीच्या संदर्भात काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीपूर्वी मतदारयादी प्रसिद्ध झाली, तेव्हा आक्षेप का घेतला नाही, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी विचारला आहे. निवडणुकीपूर्वीच यासंदर्भात याचिका दाखल करायला हवी होती, असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या नेत्यांकडून विधानसभेच्या निवडणूकीत मतदान वाढ झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यावर भाजपानेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयोगाने सर्व राजकीय पक्षांना माहिती दिली होती. तरीही निवडणूक पूर्ण होईपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नाही. उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाही दाखल केली नाही, असं भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत व मनोहर कुंभारे यांनी म्हटलं आहे.

Kedarnath helicopter accident : केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातात वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कामठी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार वाढविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला होता. यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पलटवार करीत मतदार नोंदणी योग्यच असल्याचा दावा केला. ३५,५३९ नव्या मतदारांची नोंदणी ही निवडणूक आयोगाच्या जनजागृतीमुळे झाली विधानसभा निवडणुकीच्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत निवडणूक आयोगाने अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.

Bhaskar Jadhav : निवडणूक लढा, पण पक्षाकडून खर्च मिळणार नाही!

त्यानुसार, ३० ऑगस्ट ते १९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आलेल्या अर्जांपैकी १२,९५० अर्जदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या वादात प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडून अजून अधिकृत उत्तर येणे बाकी आहे. त्यामुळे राजकीय आरोपांपेक्षा सत्य माहिती आणि दस्तऐवजांवर आधारित उत्तर महत्त्वाचे ठरणार आहे, असे राऊत म्हणाले.