Breaking

Madhuri Misal, Indranil Naik : माधुरी मिसाळ की इंद्रनील नाईक?

Even after a month, the suspense on the post of Guardian Minister remains : एक महिन्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम

Washim विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळाली. मुख्यमंत्री, मंत्री ठरले. अधिवेशन झाले आणि सरकारचा कारभारही सुरू झाला. मात्र अद्याप राज्यात पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. त्यातच वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याचीही उत्सुकता लागलेली आहे. कधी जाहीर होणार, यापेक्षा कोण होणार, याची उत्सुकता वाशीमकरांना अधिक आहे. माधुरी मिसाळ आणि इंद्रनील नाईक यांची नावे सध्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

राज्यात ३६ जिल्हे आहेत. ३८ मंत्री दोन उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री असे एकूण ४१ मंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला एक पालक मंत्री देऊनही काही मंत्री शिल्लकच राहतात. त्यामुळे मंत्र्यांची अडचण येण्याचे कारण नाही. मात्र अनेक जण एकाच जिल्ह्याची मागणी करत आहेत. यापूर्वी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होते. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाकडे होते.

CM Devendra Fadnavis : दादागिरी करणाऱ्यांना सोडणार नाही

यंदा शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातील शिंदे गटाचे उमेदवार संजय राठोड निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांची मंत्रिपदी वर्णीही लागली आहे. वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा असल्या तरी त्यापैकी एकही आमदार मंत्रिमंडळात नाही. तेव्हा जिल्ह्यासाठी इतर जिल्ह्यातूनच पालकमंत्री आयात करावा लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे अधिकच उत्सुकता ताणली गेली आहे. त्याचवेळी संजय राठोड यांच्या नावाला वाशीमचा विरोध असल्याचेही कळते.

औद्याेगिक, शैक्षणिक विकास हवा
वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. आर्थिकदृष्या मागासलेला जिल्हा आहे. या जिल्हयात औद्यागिक, शैक्षणिक क्षेत्राचा विकास होणे व सिंचन क्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्याला पूर्ण वेळ देणारे पालकमंत्री असणे गरजेचे आहे.

गेल्यावेळी कामेच झाली नाहीत
गेल्या वेळी जिल्हा व पक्षाच्या विकासासाठी त्यांच्याकडून कोणतीच कामे झाली नाहीत. त्यामुळे राठोड यांना पालकमंत्री करून जिल्ह्याचा विकास खुंटवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस CM Fadnavis काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.