Breaking

Maharashtra BJP : ‘कमळ’ सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका!

BJP workers ordered to campaign for lotus symbol for local elections : शर्टावर, साडीवर ‘कमळ’ लावण्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपूर्वी होतील, असे संकेत दिले जात आहेत. अश्यात सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत. भाजपने तर आपल्या कार्यकर्त्यांना ‘कमळ’ चिन्ह शर्टावर किंवा साडीवर लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचे नाही, अश्या सूचनाच दिल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कमळ चिन्हाच्या प्रचारावर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप कार्यकर्त्यांना शंभर दिवसांचे ‘टार्गेट’ दिले आहे. निवडणुकीपर्यंत पक्षाचे वेगवेगळ्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करावे, असे पदाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कार्यकर्ता – पदाधिकाऱ्याने ‘कमळ’ चिन्ह लावून फिरावे. त्यातून वातावरणनिर्मिती करावी, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

MSIDC : विधानभवन विस्ताराच्या कामातून पीडब्ल्यूडी आऊट!

१०० दिवसांत राज्यभरात भाजपचीच चर्चा राहिली पाहिजे, यावर पक्षनेत्यांचा भर आहे. त्यामुळेच जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात भाजपचीच चर्चा राहावी, या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे काहीही करून शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक वाटले तर होर्डिंग लावा किंवा बॅनरबाजी करा. मात्र, पक्षाचे योग्य मार्केटिंग झालेच पाहिजे, असे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.

भाजपकडून पुढील काही कालावधीत पक्षाचे चिन्ह असलेल्या ‘कमळ’च्या मार्केटिंगवर भर देण्यात येणार आहे. पक्षाच्या बूथपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनीच शर्ट किंवा साडीवर ‘कमळ’ चिन्ह लावूनच घराबाहेर निघावे, अशी सूचना देण्यात आली आहे. ‘कमळ’ चिन्हाबाबत वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी पक्षाच्या धुरिणांनी हे नियोजन केले आहे.

नागपुरात मंगळवारी विदर्भ विभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विदर्भातील ३०९ मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पक्षाच्या धुरिणांनी आखलेले नियोजन या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीही करून भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला पाहिजे.

Rashtriya Swayamsewak Sangh : काँग्रेसचे माजी मंत्री संघाच्या विकास वर्गात प्रमुख पाहुणे!

त्या दृष्टीने १०० दिवसांचा संघटनात्मक कार्यक्रम आखण्यात आला आहे. अगदी सुक्ष्म पातळीवर जाऊन लोकांशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक बूथवरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप आत्ताच करण्यात यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.