Now face reading will be done before entering the ministry : अनधिकृत प्रवेशाला बसणार चाप; प्रशासनाला विश्वास
Mumbai मंत्रालयामध्ये प्रवेश देताना आता फेस रिडींग केले जाणार आहे. मंत्रालयातील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या दृष्टीने ही नवीन प्रणाली अंमलात आणली गेली आहे. फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास देखील मदत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांना या प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार आहे. अनुचित प्रवेश रोखले जाणार आहेत. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे, असे मंत्रालय प्रशासनाने म्हटले आहे.
Building Construction Scheme : ‘मातोश्री’ योजनेसाठी ४० ग्रामपंचायती सरसावल्या
या तंत्रज्ञानामुळे अनधिकृत प्रवृत्तींनाही चाप बसणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येईल. शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल. या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे.
अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामध्ये अडचणी येणार नाहीत. तथापि, यासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शनसंदर्भातील नोंदणी करणे आवश्यक राहील. सर्वांनी यासाठीची नोंदणी आणि फेस डिटेक्शन त्वरित करून घ्यावे, यासाठी प्रशासनाने अधिसूचना काढलेली आहे.
Remarriage of Widow : विधवा वहिनीच्या पुनर्विवाहासाठी सरसावला देर
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फेस रीडिंग संदर्भातील आवश्यक डेटा हा तातडीने अपलोड करण्याच्या सूचनाही टेक्निकल टीमला देण्यात आल्या आहेत. जेणेकरून फेस रीडिंग प्रणाली अपडेट होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश सुलभ होईल.
मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे Facial recognition आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील १० हजार ५०० अधिकारी/कर्मचारी यांचा तपशिल या प्रणालीमध्ये नोंदविण्यात आला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वारांवर Facial recognition यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे. ही यंत्रणा ‘गो लाईव्ह’ करण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पासून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेशियल रिकॉग्नीनेशन व आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.
Ravikant Tupkar on Union Budget : अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले
मंत्रालय हे अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे आस्थापनेची सुरक्षा ही महत्त्वाची बाब ठरते. त्या अनुषंगाने मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. हा सुरक्षा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. मंत्रालय सुरक्षा प्रकल्प टप्पा दोनमधील कामांचे कार्यान्वयन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच अभ्यांगताना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना डिजी प्रवेश या ॲप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार आहे.