Breaking

Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme : डीएड-बीएड केले, पण मजुरीवर गेले!

 

Even with higher education, they are doing wage work : उच्च शिक्षण घेऊनही करताहेत मजुरीची कामे; रोजगारासाठी वणवण

Wardha सरकारने देशातील गरिबीची टक्केवारी कमी झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला. पण बेरोजगारी वाढत असल्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. चांगले शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळत नाहीत, हे वास्तव आहे. अशात विशेषतः पारंपरिक शिक्षण घेणाऱ्यांपुढे तर मोठ्या अडचणी आहेत. वर्धा जिल्ह्यात डी.एड., बी.एड किंवा उच्च शिक्षण घेणारी मुलं आता नोकरी मिळत नाहीत म्हणून मजुरी करताना आढळत आहेत. रोजगार हमी योजनेमध्ये त्यांची मजूर म्हणून नोंद झालेली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत रोजगाराची हमी दिली जाते. सध्या अनेक सुशिक्षितांच्या हाताला काम मिळत नीाहीये. त्यामुळे रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड काढून घेत मजुरीला जात असल्याचे चित्र आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध कामे केली जातात. या कामांवर हजारो मजूर जात आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे.

Yavatmal Zilla Parishad : प्रभार न सोपविता, कॅफो आठवडाभर सुटीवर!

विशेष म्हणजे, डी.एड, बी.एड पदवी प्राप्त तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अनेक सुशिक्षित बेरोजगारांची रोजगार हमी योजनेचे मजूर म्हणून नोंद आहे. उच्चशिक्षण घेतले असले तरी हाताला रोजगार नसल्याने ते रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरीच्या कामासाठी जातात. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत १८ ते ३० वयोगटातील २३ हजार ४४३ जणांनी नोंदणी केली आहे. तर ६ हजार ७५६ युवक मजुरीच्या कामाला आहे.

सध्या जिल्ह्यात विविध ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहे. या कामावर ५९ हजार ४४० जण कामाला आहे. यात १८ ते ३० वयोगटातील ६७५६ युवक युवतींचा समावेश असल्याचे मनरेगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जिल्ह्यात हाऊस होल्ड जॉबकार्ड काढणाऱ्यांची संख्या १ लाख ५४ हजार ७५ एवढी आहे. यापैकी ३५ हजार ७९४ जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावल्यास याद राखा!

यापैकी १०० दिवस रोजगार पूर्ण करणाऱ्या ४ हजार ४३६ मजुरांचा समावेश आहे.आज ना उद्या नोकरी मिळेल, यासाठी अनेक युवकांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. मात्र जागाच निघत नाही. परिणामी हाती नोकरी आली नाही. त्यामुळे रोहयोची कामे व शेतमजुरीची कामे करून सुशिक्षित युवक कुटुंबाला हातभार लावतात