Breaking

Mahayuti Government : हजारो बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतनाचा दिलासा!

Pension relief for thousands of construction workers : गोंदिया जिल्ह्यात ९८ हजार नोंदणीकृत कामगार; वृद्धापकाळात आर्थिक आधार

Gondia गोंदिया जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आता कामगारांना ६० वर्षांनंतर निवृत्तिवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात ९८ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४० हजारांहून अधिक कामगार सक्रिय आहेत. दरवर्षी नोंदणीची संख्या वाढत आहे. कारण योजना थेट कामगारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो.

आजवर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे वृद्धावस्थेत त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु आता निवृत्तिवेतनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार असून, सुरक्षित भविष्याची दिशा मिळणार आहे.

Mahayuti Government : तीन गॅस सिलिंडर मोफत योजनाही गुंडाळली!

१० वर्षे नोंदणी – प्रतिवर्षी ६,००० रुपये (५० टक्के लाभ)
१५ वर्षे नोंदणी – प्रतिवर्षी ९,००० रुपये (७५ टक्के लाभ)
२० वर्षे नोंदणी – प्रतिवर्षी १२,००० रुपये (१०० टक्के लाभ)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीसाठी www.mahabocw.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येते. तसेच, जिल्ह्यातील सेतू केंद्रांमधूनही नोंदणी करता येते.

Mahayuti Government : गरिबाची लेक सायकलने शाळेत जाणार!

फक्त निवृत्तिवेतनच नव्हे, तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी संच, किचन संच, अपघात विमा, घरकुल योजना, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा विविध योजनांचा लाभही मिळतो. यामुळे कामगार वर्गात शासनाच्या योजना लोकप्रिय होत आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या आयुष्याला स्थैर्य मिळणार असून, त्यांच्या मेहनतीचं चीज झाल्याची भावना त्यांना निश्चितच होणार आहे. आता गरज आहे ती योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्याची, जेणेकरून कामगारांना त्यांच्या हक्काचं निवृत्तिवेतन वेळेवर मिळू शकेल.