Public confession by Agriculture Minister Manikrao Kokate :स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जाहीर कबुली
Shirdi: शेतीवर अवलंबून असणारा वर्ग कमी होत चालला आहे, कारण शेती परवडत नाही. याचे कारण शेतक-यांना शाश्वत शेतीमालाचे दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही करु शकलो नाही, अशी खंत स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.
कृषिमंत्री कोकाटे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा साठी प्रसिद्ध आहेत. कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादाची ठिणगीही पडल्याचेही पाहायला मिळाले. अशातच आता कोकाटे यांनी केलेल्या नव्या विधानाची चर्चा आहे. विक्री व्यवस्था प्रबळ केल्याशिवाय उत्पादनाला महत्व प्राप्त होणार नाही, कमी खर्चात चांगल उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था यांची मुल्य साखळीच्या माध्यमातून एकमेकांना जोडलो गेलो तरच भविष्याकाळ उज्ज्वल होवू शकतो.
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी अबू आझमींची लायकीच काढली !
शेतकरी दुध सहकारी संस्था स्थापना करण्यास तयार नाही, खाजगी मधून दुध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतात. यात गुजरात राज्याच फार मोठं अतिक्रमण होत असून गुजरात राज्यात सहकारी व्यवसाय जोरात असून आपण महाराष्ट्र फार कमी असल्याचेही माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.