Breaking

MLA Nitin Deshmukh : शिवसेना जिल्हाप्रमुखांसाठी आमदार उतरले मैदानात !

MLA Deshmukh aggressive over water issue : दहिहंड्यातील पाण्याच्या प्रश्नावरून आमदार देशमुख आक्रमक

Akola दहिहंडा गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे गटनेते गोपाल दातकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अकोट उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्याशी चर्चा केली. मात्र, इंगळे यांनी सदर प्रकरणात दिशाभूल करून अकोट पोलिस ठाण्यात गोपाल दातकर यांच्याविरोधात चुकीचे व निराधार आरोप करत तक्रार दाखल केली असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

ही तक्रार पूर्णपणे तथ्यहीन असून, दातकर यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी ४ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राजेंद्र इंगळे यांच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Mahayuti Government : पीकविमा योजनेतील नुकसानाची ट्रिगर अट हटवण्याची शिफारस

यासंदर्भात आमदार नितीन देशमुख व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या विरोधात प्रशासकीय विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.

दहिहंडा गावातील सरपंच संजय आठवले यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत इंगळे यांच्या कार्यालयात भेट दिली होती. मात्र, प्रश्न न सोडवता इंगळे यांनी सरपंचांच्या मोबाईलवरून गोपाल दातकर यांच्याशी संपर्क साधून वाद घातल्याचे समोर आले.

आमदार देशमुख म्हणाले की, पाण्याच्या समस्येवर तोडगा न काढता, पुढील कारवाई टाळण्यासाठी इंगळे यांनी खोटी तक्रार करून दातकर यांना गोवण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाची दिशाभूल करणारी ही तक्रार असल्याचा त्यांचा दावा आहे.

NDA Government : वक्फ सुधारणा विधेयकाला दोन्ही समाजांचा विरोध!

इंगळे यांच्याविरोधात दोन दिवसांत कारवाई न झाल्यास कायदेशीर आंदोलन करण्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख मंगेश काळे, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, अतुल पवनीकर, विकास पागृत, मुकेश मुरूमकार, संजय शेळके, अर्जुन गावंडे, तरुण बगेरे आदी उपस्थित होते.