BJP leader questions Rahul Gandhi with statistics : भाजप नेत्याचा राहुल गांधींना सवाल; आकडेवारीसह भाजपचे प्रत्युत्तर
Akola वायनाड मतदारसंघात मतदारसंख्येत वाढ झाली की ती लोकशाही, आणि महाराष्ट्रात वाढ झाली की ती मतांची चोरी कशी होऊ शकते? असा थेट सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना केला आहे. राज्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खोटे आरोप करणे थांबवा, अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेकडून चोख उत्तर मिळेल, असा इशारा त्यांनी दिला.
राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मतदारसंख्येतील वाढीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्याच राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात देखील २०१९ ते २०२४ दरम्यान ७.७% इतकी वाढ झाली असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
Vijay Wadettiwar : साडेचार हजार रुपयांत असं काय खाल्लं असेल ?
📌 वायनाड (राहुल गांधी यांचा मतदारसंघ):
२०१९ – १३,५७,८१९ मतदार
२०२४ – १४,६२,४२३ मतदार
वाढ – १,०४,६०४ (७.७%)
📌 नागपूर दक्षिण पश्चिम (देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ):
२०१९ – ३,८४,३५५ मतदार
२०२४ – ४,११,२४१ मतदार
वाढ – २६,८८६ (६.९९%)
Devendra s : नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
या आकडेवारीच्या आधारे सावरकर म्हणाले, “आपल्या मतदारसंघात वाढ झाली की ती ‘जागरूक मतदार’, आणि महाराष्ट्रात वाढ झाली की ती ‘बनावट’? हा कुठला न्याय? राहुल गांधींनी हे दुटप्पी वागणं थांबवावं.”
“मुंबई, ठाणे, नागपूरसारख्या शहरी भागात स्थलांतर व नवमतदारांमुळे दर निवडणुकीत ५ ते ८% मतदारवाढ होतेच. त्यामुळे या वाढीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे केवळ राजकीय दुर्भावना व खोटा प्रचार आहे,” असंही सावरकरांनी स्पष्ट केलं.
‘व्होट थेफ्ट’ नव्हे, ‘ट्रुथ थेफ्ट’!
Manikaro koKate : सोयाबीन, भुईमूग बियाण्याचे अनुदानावर वितरण सुरू
सावरकर म्हणाले, “आज देशात मतांची नव्हे, तर सत्याची चोरी सुरू आहे आणि राहुल गांधी त्याचे शिल्पकार आहेत. काँग्रेसच्या पराभवांची आकडेवारी जनतेपुढे मांडण्यास आम्ही तयार आहोत. पण राहुल गांधींनी आधी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.”
“फडणवीसांच्या कार्याची बरोबरी करू शकत नाहीत”
“देवेंद्र फडणवीस हे विकासदृष्ट्या राज्याला पुढे नेणारे सक्षम नेते आहेत. त्यांच्या कार्याची बरोबरी राहुल गांधी कधीच करू शकणार नाहीत. म्हणूनच नकारात्मक प्रचार, आकडेवारीचा विपर्यास आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप आमदार सावरकरांनी केला.