BJP tortured the people in the name of development : विकास ठाकरेंची टीका; महापालिका निवडणुकीत फटका बसेल
Nagpur लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींसारख्या हेविवेट नेत्याची आघाडी कमी करणारे विकास ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने विकासाच्या नावावर जनतेचा छळ केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनतेच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार आहे, असा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा आमदार ठाकरे यांनी केला आहे.
गेल्या तीन निवडणुका भाजपने जिंकल्या आणि महापालिकेत सत्ता राखली. मात्र यंता, काँग्रेसकडून यंदा मनपामध्ये सत्तापरिवर्तन होणार असा दावा करण्यात आला आहे. प्रभागरचना कितीही सदस्यांच्या संख्येनुसार केली तरी यावेळी नागपुरात निकाल बदललेला दिसेल. भाजपने विकासाच्या नावावर जनतेचा छळ केला आहे, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.
Smart City project : डिसेंबरपर्यंत पूर्ण करा स्मार्ट सिटीचे प्रकल्प
भाजप नेते, पदाधिकाऱ्यांचा विकास झाला; पण जनतेचे पायाभूत प्रश्न सुटलेले नाहीत. गेल्यावेळी चारसदस्यीय प्रभागाचा फायदा घेत भाजपने मोठे संख्याबळ गाठले. यावेळी जनता भाजपवर नाराज आहे. त्यामुळे बहुतांश प्रभागांत भाजपचे चारही उमेदवार पराभूत होतील व भाजपला मोठा फटका बसेल, असा दावा ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील ‘अ, ब, क’ वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी जारी केले आहेत. त्यानुसार नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. २०२५ मध्ये होणारी महापालिका निवडणूक ही वर्ष २०१७ च्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार आहे. सदस्य संख्याही १५१ कायम राहणार आहे. परंतु शहरातील वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर नव्याने प्रभाग रचना व आरक्षण काढले जाणार आहे.
Harshawardhan Sapkal : मोठे प्रोजेक्ट राबवून पैसे खाण्याचे काम !
चार सदस्यीय प्रभागामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेससह विरोधी पक्षाची चिंता वाढली आहे. २०१७ मध्ये झालेली महापालिकेची प्रभाग रचना ही २००१ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली होती. त्यानुसार ३८ प्रभागात १५१ सदस्य होते. आता होणारी प्रभाग रचना ही २०११ च्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे प्रभागांची संख्या व सदस्य संख्या वाढणार की जुनीच १५१ कायम राहणार याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रभाग संख्या व सदस्य संख्याबाबत संभ्रम आहे.