Breaking

MVA : आधी खांद्याला खांद्या लावून लढले, आता एकमेकांच्या समोर उभे ठाकणार!

First they fought together, now fighting with each other : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला

Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित आहे. कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या या भूमिकेमुळे संभ्रमात पडले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवली. आता त्यांच्या विरोधात उभे राहावे लागणार असल्याने याचा मतदारांवर काय प्रभाव पडणार याबाबत इच्छुकांमध्ये उलट सुलट प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत स्थानिक स्वराज्य संस्थेचे होईल या दृष्टिकोनातून इच्छुकांकडून तयारी सुरू आहे. असे असातनाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्व महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यांवरच पाणी फेरल्या गेले आहे. आता नव्याने निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.

Farmers suicide : राजकीय अनास्थेमुळे रोज तीन शेतकऱ्यांचे बळी !

मुंबई, नागपूरसारख्या प्रमुख महापालिका सोडल्या तर शिवसेनेची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची फारशी तयारी असल्याचे दिसून येत नाही. अकोला महापालिकेतच 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ आठ जागांवर विजय मिळवला होता. स्वतंत्र निवडणूक लढविण्यास अनेक प्रतिस्पर्धी निर्माण होणार आहेत. त्यात विजय मिळवणे कठीण होईल. असा सूर शिवसेनेच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये खासगीत बोलताना उमटत आहे.

अनेकांना संधी मिळेल, पण…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे सर्वांनाच संधी मिळावी. कार्यकर्त्यांनी काय केवळ चटई, सतरंजी उचलायची का? असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारत आहेत. स्वतंत्र लढण्यासंदर्भात या दोन्ही पक्षात एक मत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला मात्र महाविकास आघाडी अशा प्रकारे बिघाडी होईल अशी अपेक्षा नव्हती.

शिवसेनेच्या निर्णयाने महाविकास आघाडीचे विसर्जन झाल्या तर जमा आहे. मुळे स्वतंत्र लढणाऱ्या सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल, पण विजयाची खात्री किती राहील याबाबत संभ्रम आहे.

Mahametro Nagpur : मेट्रो स्थानकांवरून फिडर सेवा !

संख्याबळाचाही व्हावा विचार!
महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढताना त्या त्या महापालिकेतील संख्याबळाचा विचार व्हावा. असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. स्थानिक पातळीवर आघाडीचा पर्यायही खुला ठेवण्यात यावा असे मतही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात स्थानिक पातळीवर हा विकास आघाडीतील घटक पक्ष कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.