Breaking

Nana Patole : भंडारा जिल्हा परिषदेत पटोले ठरले बाजीगर!

 

Congress has complete control over Bhandara Zilla Parishad : दोन सभापतींची ईश्वरचिठ्ठीने निवड; काँग्रेसचा पूर्ण ताबा

Bhandara जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाजीगर ठरले आहेत. संपूर्ण भंडारा जिल्हा परिषद आता काँग्रेसच्या ताब्यात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र महायुतीच्या तावडीतून अख्खी जिल्हा परिषद स्वतःकडे ओढत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षच नव्हे तर अख्खी जिल्हा परिषद नाना पटोले यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडे जाऊ पाहणाऱ्या उमेदवाराला नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवून दिले. त्यानंतर महायुतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यशस्वी झाले. विषय जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेऊन दाखवला.

Minister for Industries Uday Samant : ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’

निवडणुकीच्या काही तासापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार असे पाच सदस्य गायब झाले होते. हे पाचही सदस्य फुटल्याने संपूर्ण भंडारा जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे नाना पटोले यांचे नशीब सध्या जोरावर असल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईश्वराने देखील नाना पटोले यांना साथ दिली आहे.

सभापती पदाच्या निवडणुकीत नरेश ईश्वरकर, आनंद मल्लेवार, अनिता नलगोकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले. काँग्रेसच्या शीतल राऊत यांनाही निवडणुकीमध्ये याच ईश्वरचिठ्ठीने साथ दिली. भाजपचे उमेश पाटील निवडणुकीदरम्यान गायब होते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीमध्ये यश मिळवणे सहज शक्य झाले. भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्षपद स्वतःहून भाजपकडे चालून आले होते.

Anuja Sawale : जिल्हाध्यक्ष काझींकडून मानसिक छळ !

मात्र हे पद भाजपला स्वतःकडे कायम ठेवता आले नाही. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष काँग्रेसचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद गेले. मात्र त्यानंतर पूर्ण फासे फिरले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे मिळून पाच सदस्य गायब झाले. त्यांनी महायुतीचा पूर्ण ‘गेम’ केला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये नाना पटोले यांची कॉलर आणखी टाईट’ झाली आहे.

अख्खी जिल्हा परिषदच महायुतीच्या हातून निघून गेल्याने अनेकांना आता मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या या पराभवाला कोण कारणीभूत आहे? याचा शो आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच घरचे भेदी ठरले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला गंभीर देणे आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे.

Pentakli villagers go on hunger strike : गावकऱ्यांचे पाण्यात उतरून आंदोलन; गावठाण स्थलांतरणाचा मुद्दा चिघळला

या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय पार्टीला करावे लागेल. प्रसंगी काही नेते देखील बदलावे लाग आहेत. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला यश मिळालं त्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच घरचे भेदी ठरले अ त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे. या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय पार्टीला करावे लागेल.

प्रसंगी काही पदाधिकारी देखील बदर लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यासाठी नेते दिवस-रात्र एक करीत आहेत. आपल्या रक्ताचे पाणी करीत आहेत. परंतु पदाधिकाऱ्यांना याचं गांभीर्य वाटत नाही. त्यांच्याच चुकीमुळे भंडारा जिल्हा परिषद हातून निघून गेल्याचं आता बोललं जात आहे.