Breaking

Narendra Modi : गुरूजी म्हणाले होते, संघ म्हणजे प्रकाश!

Prime Minister Narendra Modi praised the work of RSS volunteers : पंतप्रधानांनी केला स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव

Nagpur : परमपूज्य गोळवलकर गुरूजींनी संघाची तुलना प्रकाशासोबत केली होती. एकदा मुलाखतीमध्ये गुरूजींना विचारण्यात आले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वव्यापी का म्हणतात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, ‘प्रकाश सर्वव्यापी असतो. तो स्वतः एकटा भलेही कार्य करणार नाही. पण अंधार दूर करून इतरांना कार्य करण्याचा मार्ग दाखवतो.’ संघाचेही कार्य असेच काहीसे आहे. त्यामुळे गुरूजींची शिकवण आमच्यासाठी जिवनमंत्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज (३० मार्च) नागपुरात माधव नेत्रालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्हाला प्रकाश बनून अंधार दूर करायचा आहे. हेच कार्य गेल्या काही दशकांपासून माधव नेत्रालय हे संस्थान करत आहे. परमपूज्य गुरूजींचा भाव आम्ही जिवनभर ऐकत राहिलो. प्रयत्नांमध्ये ‘मी’ नाही तर ‘आम्ही’चे ध्यान होते. राष्ट्र प्रथमची भावना सर्वप्रथम असते. लोकांचे हितच मोठे असते. तेव्हा प्रभाव आणि प्रकाश दिसू लागतो.

PM Narendra Modi : माधव नेत्रालय म्हणजे आध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे अदभूत विद्यालय !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारयज्ञ आहे. जो अंतःदष्टी आणी बाह्यदृष्टीसाठी काम करतो. बाह्यदृष्टीसाठी माधव नेत्रालयाकडे संघ सेवेचा पर्याय बनवला आहे. शरीर परोपकारासाठीच, सेवेसाठीच आहे आणि ही सेवा संस्कारामध्ये येते, तेव्हा सेवाच साधना बनते. हीच साधना प्राणवायू आहे. ही साधना पिढ्यानपिढ्या स्वयंसेवकांना तपस्येसाठी प्रेरणा देते. ही साधना सेवकांना गतीमान ठेवते. कधी थकू देत नाही. कधी थांबू देत नाही. गोळवलकर गुरूजी म्हणत जिवनाच्या उपयोगीतेचे महत्व असते. लहान मोठे कोणतेही काम असो, कोणतेही क्षेत्र असो, सीमावर्ती गाव, पहाड, जंगल. स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने कार्य करत असतात, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi : पवित्र यज्ञात पुण्य संकल्पाच्या विस्ताराचे साक्षीदार होता आले !

स्वयंसेवक कुठे एकल विद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तर कुठे सांस्कृतिक जागरण करत आहेत. सेवाभारतीसोबत जुळून गरीब वंचितांची सेवा करत आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभात स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली. जेथे सेवाकार्य तेथे स्वयंसेवक, असे सूत्र आहे. पूर, असो की भुकंप शिस्तबद्ध शिपायांसारखे स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचतात. स्वतःची पिडा न बघता सेवाभावनेतून कामाला लागतात, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला.