Breaking

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या क्षयरोगमुक्त भारत संकल्पनेला जिल्हा परिषदेचे बळ

 

Zilla Parishad strengthens Prime Minister Modi’s vision of a tuberculosis-free India : ११२ ग्रामपंचायती टीबीमुक्त, ११ ग्रामपंचायतींना रजत, तर १०१ ग्रामपंचायतींना कास्य प्रमाणपत्र

Wardha : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ११२ ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्या आहेत. या ग्रामंपचायतींचा सीईओ जितीन रहेमान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टीबीमुक्त ११ ग्रामपंचायतींना रजत, तर १०१ ग्रामपंचायतींना कास्य पदक देण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात हा सोहळा २४ रोजी पार पडला. उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) ज्ञानदा फनसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतक, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुता सूर्यवंशी, डॉ. हेमंत गोल्हर यांची उपस्थिती होती.

PM Narendra Modi : पिक कर्ज व्याज सवलत योजना आता ५ लाखापर्यंत!

प्रास्ताविक डॉ. हेमंत पाटील यांनी केले. डॉ. राज पराडकर जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा यांनी आशा सेविका व सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या क्षयरोग आजाराविषयी केलेल्या कामाबदल प्रोत्साहित केले. ज्ञानदा फणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जिल्हा परिषद, वर्धा यांनी आपल्या भाषणात टीबीमुक्त ग्रामपंचायतीबाबत सर्व ग्रामपंचायत स्तरावर पुढाकार घेऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

PM Narendra Modi Dream Project : नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर ‘लखपती दिदी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोगमुक्त भारत करण्याच्या संकल्पनेनुसार वर्धा जिल्हा टीबीमुक्त करण्याकरिता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन काम करावे व जेणेकरून २०२५ पर्यंत वर्धा जिल्हा टीबीमुक्त करण्यास मदत होईल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांनी केले. पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त झाल्याने कांस्य प्रमाणपत्र, तर दुसऱ्या वर्षीही टीबीचा एकही रुग्ण आढळून न आल्याने रजत प्रमाणपत्र देण्यात आले.

PM Narendra Modi : मराठीतून संवाद, वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् विचारपूस!

तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त गाव राहिल्यास सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये ११२ ग्रामपंचायतींना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला २८ ग्रामपंचायतींचे सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, समुदायिक आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अख्तर शेख, स्वप्नील कांबळे यांनी सहभाग दर्शविला. संचालन सुमंत ढोबळे यांनी केले, तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गोल्हर यांनी मानले.