Sharad Pawar’s NCP’s warning to ‘go alone..’ : ..तर सामाजिक संघटनांना सोबत घेऊन स्थानिकच्या निवडणुका लढवणार
Nagpur : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यांत होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सामना होईल, हे सध्यातरी निश्चित नाही. कारण मित्रपक्ष स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी ‘एकला चलो रे..’चा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक काल पक्ष कार्यालयात कुंटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल (१० मे) पार पडली. लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत असताना मित्रपक्षांसोबत सन्मानजनक आघाडी न झाल्यास नागपूर शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन निवडणुका लढवाव्या, या मतावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे.
Amol Mitkari : ‘‘मलाच नाही मिळालं, मग शेतकऱ्यांचे काय होणार?’’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना तालुका अध्यक्षांनी पूर्वतयारी म्हणून आपापल्या तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हाध्यक्षांना द्यावा, असे प्रवीण कुंटे पाटील यांनी सांगितले. नागपूर जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळा सध्या सर्वत्र गाजत आहे. या घोटाळ्याची चौकशी ईडीमार्फत करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि शाळांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारीत चित्रपटाला सिनेमागृह मिळत नाहीये. यासाठी काही जातीयवादी शक्ती प्रयत्न करत आहेत. सदरमधील एका सिनेमागृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक शो आयोजित करण्यात आला होता. याचा अनुभव यावेळी आला. ही अडवणूक तात्काळ थांबवावी, शासनाने या चित्रपटासाठी सिनेमागृह उपलब्ध करून द्यावे आणि हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
Tapi Mega Recharge Project : हा प्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान!
बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश उपाध्यक्ष शेखर कोल्हे, प्रदेश सरचिटणीस विनोद हरडे, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली टालाटूले, रश्मी जामदार, बबिता सोमकुंवर, प्रमिला दरने, प्रेमलता वानखडे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.