Breaking

Nitin Gadkari : नागपुरात सुरू होणार इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी

Electric bus manufacturing company in Nagpur : दोन वर्षांत लागतील दहा हजार चालक

Nagpur नागपुरात लवकरच इलेक्ट्रिक बस तयार करणारी फॅक्ट्री सुरू होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय या कंपनीला दोन वर्षांत दहा हजार चालकांची Driver गरज पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.१८ जानेवारी) दिली.

नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री मथुरादास मोहता विज्ञान कॉलेजच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोजगार निर्माण करणाऱ्या संशोधनाची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले. विदर्भात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन रोजगार निर्माण करणाऱ्या संशोधनावर भर द्यावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.

MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

‘दिल्लीत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याठिकाणी टाटा, सुझुकी, महिंद्रासारख्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनच्या गाड्या मार्केटमध्ये आणल्या आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर या गाड्या धावणार आहेत. टीव्हीएस, बजाज, होंडा यांच्या इथेनॉल आणि सीएजीवर धावणाऱ्या स्कुटर देखील मार्केटमध्ये आल्या आहेत,’ अशी माहिती गडकरींनी दिली.

दोन वर्षांनी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल तेव्हा येथून उड्डाण भरणाऱ्या पहिल्या विमानात शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन असेल. यातून शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे आणि रोजगारही निर्माण होणार आहे, असंही ते म्हणाले.

A perverse psychiatrist in Nagpur : मानसोपचारतज्ज्ञाची आणखी प्रकरणं येताहेत पुढे !

गडकरी या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आठवणींना उजाळा दिला. ‘मी या कॉलेजमध्ये शिकलो. त्यामुळे या शिक्षण संस्थेशी माझा जवळचा संबंध राहिलेला आहे. त्या काळात उत्तम अशा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आयुष्यात काहीतरी काम करता आले. त्यावेळच्या सर्वच प्राध्यापकांची आजही आठवण होते, असंही ते म्हणाले.

‘कॉलेजमध्ये खूप चांगले वातावरण होते. येथील कौटुंबिक वातावरणात संस्कारही उत्तम मिळाले. येथील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वैज्ञानिक, अधिकारी आहेत. आमच्या बॅचमधील अनेकांचे जीवन या कॉलेजने बदलले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.