Citizens of Tarodi Khurd colony under Pradhan Mantri Awas Yojana are suffering : प्रधानमंत्री आवास योजनेतील तरोडी खूर्द वसाहतीतील नागरिकांचे हाल
Nagpur : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून कमी पैशांत घरे उपलब्ध करून देण्यात आली. परंतु सदोष, अपूर्ण बांधकाम, पाण्याची समस्या यांसह इतरही कारणांमुळे मौजा तरोडी (खुर्द) येथील खसरा क्रमांक ६२ मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील रहिवासी त्रस्त आहेत. हे काम करणारी कंपनीच काळ्या यादीत गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही कामे सदोष आहेतच, हे सिद्ध होत असल्याचे लोक सांगतात.
आजवर येथील समस्यांसदर्भात एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. अधिकाऱ्यांनी वसाहतीत बैठका घेत समस्याही जाणून घेतल्या. पण उपाययोजनांची केवळ आश्वासने मिळाल्याची तक्रार नागरिक करतात. विशेष म्हणजे या संपूर्ण 24 इमारतींचे बांधकाम करणारी कंपनीच काळया यादीत गेल्याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनी दिली. फ्लॅटधारकांनी सोसायटी बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण 5 वर्षांपासून दुरुस्ती व देखभाल न झाल्याने ही कामे पूर्ण करण्याची हमी द्यावी, अशी मागणी फ्लॅटधारकांनी निवेदनातून केली.
Dr. Pankaj Bhoyar : अरे बाप रे! एवढ्या समस्या? पालकमंत्रीही दमले!
सोमवारी (१७ मार्च) येथील रहिवाशांनी एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांच्या कार्यालयात निवेदन सादर करून समस्यांचा पाढा वाचला. गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने येथील सदनिकांची सोडत काढण्यात आली. आजघडीला येथे जवळपास 700 फ्लॅटमध्ये 3 ते 4 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. पण येथील अनेक कामे अद्यापही दोषपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?
गेल्या पावसाळ्यात अनेकांच्या घरात भींतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. पण काहीच इमारतीची डागडुजी सुरू आहे. तर इतर कामे संथ गतीने सुरू आहेत. पाण्याच्या टाक्या लीक आहेत. सिवेजचे पाईप लहान असल्याने मैला वाहून जाण्यात अडथळा येतो. ठिकठिकाणी गट्टूची कामे अपूर्ण आहेत. इलेक्ट्रिसिटीचीही कामे फारच सदोष असल्याने धोका निर्माण झाला आहे.
Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!
सोलार अद्यापही सुरू झालेले नाही. अनेक बिल्डिगमध्ये पिण्याचे पाणी पोहोचत नाही. तर उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाई चार वर्षांपासून नागरिक सहन करीत आहेत. वसाहतीच्या आवार भींती व तारांच्या कुंपणाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. अशा अनेक समस्यांच्या तणावात नागरिक राहत आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित करावे, अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी निवेदनातून केली.