Breaking

Praful Gudadhe : मुख्यमंत्र्यांनीच दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केला

Defeated Congress candidate makes serious allegations against CM : काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी

Nagpur नागपूरमधील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यातील २०१४ आणि २०२४ मध्ये या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना त्यांनी पराभूत केले. पण २०२४ च्या पराभवाच्या धक्क्यातून गुडधे अद्याप सावरलेले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिमच्या निवडणुकीत घोळ केल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री हे मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकले आहेत. प्रत्यक्षात ते निवडणूक हरले आहेत. त्यामुळे नैतिकता पाळत त्यांनी आमदारकीचा व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनीदेखील हा मुद्दा ट्वीट करत आरोप केले होते, हे विशेष. निवडणुकीच्या कालावधीत दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पोहे खाण्यासाठी थांबून राहुल गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

Collector of Nagpur : गावांतील छोट्या-मोठ्या तक्रारींवर शोधले ‘समाधान’!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यात ८ टक्के मतदार वाढले आहेत. काही बूथवर तर २० ते ५० टक्के मतदार वाढविण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर केला. हाच धागा धरत प्रफुल्ल गुडधे यांनी आरोप केले. लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात तब्बल ३३ हजार ७२० मतदार वाढले. एका मोबाइल नंबरवरून ४० ते १०० मतदारांची नोंदणी करण्यात आली.

निवडणूक विभागाने या मतदारांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी केली नाही. झालेल्या नोंदणीपैकी ऑनलाइन किती व ऑफलाइन किती याची माहिती आयोग देत नाही. फॉर्म १७ ए व १७ सी ची माहिती मागितली असता आयोगाने ती दिली नाही. नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या सर्व मतदारांचे बीएलओ रिपोर्टही देण्यात आले नाहीत, असा आरोपही गुडधे यांनी केला.

Sandip Joshi on Vijay Wadettiwar : संदीप जोशींचा वडेट्टीवारांवर पलटवार; काँग्रेस-मुस्लिम लीग एकाच नाण्याच्या दोन बाजू

आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केले की मुख्यमंत्री फडणवीस हे त्यावर उत्तर देतात. ते आयोगाचे प्रवक्ते आहेत का, मुख्यमंत्री म्हणून त्यांना राज्यातील बरीच कामे आहेत. त्यांनी आयोगाचे काम करू नये, अशी टीका प्रफुल्ल गुडधे यांनी केली. आयोगाने एकतर मागितलेली माहिती द्यावी व आम्हाला खोटे ठरवावे, असे गुडधे म्हणाले.