Breaking

Prakash Ambedkar : केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा

Central government’s decision on caste census is a fraud : ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली

Akola केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी तो फसवा निर्णय असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

“सरकारने अद्याप जनगणना कधी करणार? याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जातीय जनगणना करणे शक्य नाही. यामुळे केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!

2026 मध्ये होणाऱ्या परिसीमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हेतुपुरस्सर जनगणना लांबवत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. “जर जनगणनाच झाली नाही, तर जातीय जनगणना कशी होणार? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनेचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. “या घटनेमुळे देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा हा निर्णय घेतला का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Akash Fundkar : म्हणून शेवटच्या बिंदूपर्यंत पाणी पोहोचत नाही!

वंचितचे आंदोलन २ मे रोजी
काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला कठोर उत्तर देण्याची मागणी होत असतानाच, वंचित बहुजन आघाडीतर्फे २ मे रोजी मुंबईत एकदिवसीय शांततेच्या लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील फोर्ट येथे हुतात्मा स्मारक परिसरात दुपारी २ वाजता हे आंदोलन होणार आहे.