Breaking

Project affected people : प्रकल्पग्रस्तांचा खाट, बाज मोर्चा, आंदोलन सुरूच !

Project affected people’s cot, Baj Morcha, agitation continues : धरण यंत्रणेने तहसीलदारांना पत्र देऊन आंदोलकांना धरणावर येण्यास बंधने घातली

Wardha : दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने शुक्रवारी २४० कोटींच्या पॅकेजसाठी खाट-बाज मोर्चा काढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलिसांनी काही प्रकल्पग्रस्तांना अटक करून रात्री त्यांची सुटका केली. या मोर्चाने वर्धावासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

२३ जानेवारीपासून दिंदोडा येथे वर्धा नदीवर चुल्हा जलावो आंदोलन सुरू आहे. ९ फेब्रुवारीला चंद्रपूरचे पालकमंत्री प्राचार्य डाॅ. अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बोलून मुंबईत बैठक लावतो, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार १८ फेब्रुवारीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

NCP Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह व सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

जलसंपदा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटतो व त्यांच्या कानावर २४० कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्याबाबत चर्चा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. त्यामुळे दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी ‘खाट – बाज’ मोर्चा काढून ‘चुल्हा जलाओ’ आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मोर्चा ठरविण्यात आला. परवानगीचे पत्र वरोरा व मारेगाव तहसीलदारांना दिले. मात्र, धरण यंत्रणेने तहसीलदारांना पत्र देऊन आंदोलकांना धरणावर येण्यास बंधने घालावी, असे सांगितले.

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी दुपारी २ वाजता मोर्चा काढला. धरण यंत्रणेने यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते खोदून ठेवले होते. रस्त्यात मुरूम, गोट्याचे ढीग टाकले होते. जेसीबी आडव्या लावल्या होत्या. तरीही मोर्चा धरणावर पोहोचला. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचा पोलिस ताफा वर्धा नदीवर तैनात होता. रस्त्यारस्त्यांवर पोलिस अडवणूक करीत होते.

Pankaj Bhoyar : गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त

धरणाशेजारी पोलिसांनी मोर्चाला अडवले. प्रकल्पग्रस्त डोक्यावर खाटा घेऊन, हातात झेंडे, बॅनर, बैल बंडी, धान्य, पाणी घेऊन ‘लढेंगे – जितेंगे’ म्हणत २४० कोटींचे पॅकेज मंजूर झालेच पाहिजे, अशा घोषणा देत होते. मोर्चा भर उन्हात धरणावर पोहोचला. तेथे भाषणे, घोषणा देत शासनाचा निषेध करण्या आला. सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी विलास भोंगाडे, अभिजित मांडेकर यांना पकडून वाहनात कोंबले. महिलांनी वाहन अडविले. मात्र, पोलिसांनी जबरीने त्यांना वाहनात कोंबले. माढळी पोलिस चौकीत नेऊन नावे लिहून घेत त्यांची सुटका केली. बैलबंडी व बैलांचे पंचनामे करून सोडून देण्यात आले. २४० कोटींचे पॅकेज मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केला आहे.