Breaking

PWD Maharashtra : शेकडो झाडांची कत्तल केली कुणी?

Hundreds of trees were cut by an unknown person : प्रशासनालाच पडला प्रश्न; गुन्हा दाखल

शहरातील रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची कुठलीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली. अशोकाची ४१० तर पामची १५२ झाडे तोडण्यात आली आहे. झाडांची अवैध पद्धतीने कापणी केल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराणाप्रताप पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहर सौंदर्यीकरणासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. नागपूरचा रिंग रोड हा हिंगणा टी-पॉइंटपासून कळमनापर्यंत अनेक किलोमीटर लांबीपर्यंत पसरला आहे. मात्र, या रिंग रोडवर त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौक दरम्यान सुमारे चार किलोमीटरच्या अंतरात दुभाजकावर लावण्यात आलेल्या शेकडो झाडांना अत्यंत क्रूर पद्धतीने कापण्यात आले आहे.

The disabled will be self-reliant : दिव्यांग होणार स्वावलंबी!

कोणाच्याही परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या वृक्षतोडीमुळे अगदी २०-२० फुटांचे अशोकाचे शेकडो झाड आता फक्त तीन ते चार फुटांचे शिल्लक राहिले आहेत. तर अनेक शोभिवंत पामच्या झाडांची पण अशाच पद्धतीने कत्तल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल केला असून चौकशी सुरू आहे, असे प्रतापनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश सांगडे यांनी सांगितले.

शासकीय विभागांतील असमन्वयांमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षात वाढलेल्या शेकडो झाडांची अशा पद्धतीने कत्तल केल्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही कत्तल सुरू होती तेव्हा प्रशासन कुठे होते, असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Food and drugs department : अपुऱ्या धान्याचा घोळ थांबवा!

पोलिसांनी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली असून त्यांना बोलावून त्यांची चौकशी ही केली आहे. त्यांनी झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराचा शोध सध्या सुरू आहे. दुसरीकडे या कृत्याने वनप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींणी संताप व्यक्त केला आहे. चार वर्षांपूर्वी ही झाडे लावण्यात आली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही झाला. त्यामुळे या झाडांची होणारी कत्तल दुर्दैवी आहे, अशी खंत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली.