Breaking

R. R. Patil Sundar Gram Puraskar Scheme : आर.आर. पाटलांच्या नावाचा पुरस्कार सरकारने बंद केला?

The government has not presented the award named after R.R. Patil for two years : दोन वर्षांपासून वितरणच झालेले नाही; सरपंच, उपसरपंचांच्या फेऱ्या

Nagpur कधी निधीच्या कारणाने, तर कधी प्रशासकीय उदासीनतेमुळे महत्त्वाच्या पुरस्कारांचा फाईलबंद करण्यात सरकार पटाईत असते. अनेक पुरस्कार काही वर्ष दिले गेले, त्यानंतर ते कायमचे बंद झाले. आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या नावाने सुरू केलेल्या पुरस्काराचेही तेच हाल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा पुरस्कार प्रदानच केला गेला नाही.

आर.आर. पाटील यांच्या नावाने ‘सुंदर ग्राम पुरस्कार योजना’ सुरू झाली होती. या योजनेचा निधी गेल्या दोन वर्षांपासून मिळालेलाच नाही. सुमारे तीन कोटी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त न झाल्याने पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच आणि सचिव पंचायत विभागाच्या फेऱ्या मारत आहेत.

Pravin Datake : भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सुरुवातीला स्मार्ट ग्राम योजना म्हणून सुरू झालेल्या उपक्रमाचे नंतर नामकरण ‘आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजना’ असे करण्यात आले. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ही स्पर्धा राबवली जाते. दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून एका गावाला १० लाखांचा आणि जिल्हास्तरावर एका गावाला ४० लाखांचा पुरस्कार दिला जातो. याप्रमाणे वर्षाला १ कोटी ७० लाखांचा निधी लाभार्थी गावांना दिला जातो.

ही स्पर्धा स्वच्छता, गाव व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर अशा १०० गुणांवर आधारित असते. स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर गौरवण्यात येते. मिळणाऱ्या निधीतून गावात विविध विकासकामे करता येतात.

Local Body Elections : इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या, नेत्यांच्या दरबारी चकरा वाढल्या

रखडली आहेत. विशेष म्हणजे, हा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
पुरस्काराचा निधी रखडल्याने गावपातळीवर नाराजीचे वातावरण आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी शासनाकडे निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केली असून, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागानेही याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला आहे.