Indian Railways is symbol of insecurity : भारतीय रेल्वे असुरक्षिततेचे, अराजकतेचे प्रतीक
New Delhi ठाणे जिल्ह्यात चालत्या लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भारतीय रेल्वे असुरक्षिततेचे-अराजकतेचे प्रतीक बनली आहे. सरकारने 11 वर्षात जबाबदारी न दाखवता केवळ अपप्रचार केला आहे, आता केंद्राने वर्तमानाबद्दल बोलणे बंद केले आहे आणि 2047 ची स्वप्ने दाखवत आहेत.
ठाणे जिल्ह्यात गर्दीमुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. या प्रकारानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा मोदी सरकार आपला 11 वर्षांचा सेवा कालावधी साजरा करत आहेत, तेव्हा मुंबईतून आलेल्या एका दुःखद बातमीमध्ये देशाचे सत्य दिसून येत आहे – ट्रेनमधून पडून अनेकांचा मृत्यू झाला.’
Rahul gandhi : बावनकुळे यांच्या मतदारसंघात अचानक इतके मतदार वाढले कसे ?
भारतीय रेल्वे हा करोडो लोकांच्या जीवनाचा कणा आहे, पण आज ती असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचे प्रतीक बनली आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यांनी लिहिले, ‘मोदी सरकारची 11 वर्षे – जबाबदारी नाही, सुधारणा नाही, फक्त प्रचार. सरकारने 2025 बद्दल बोलणे बंद केले आहे आणि आता 2047 ची स्वप्ने विकत आहेत.’
Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हणाले आहे की, आज देश ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? राहुल गांधी यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
Congress leaders : सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही !
दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, ट्रेन कसाराकडे जात होती. दोन गर्दीच्या गाड्यांच्या फूटबोर्डवरून प्रवासी लटकल्याने आणि त्यांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगितले जात आहे.