Breaking

Rahul gandhi : बावनकुळे यांच्या मतदारसंघात अचानक इतके मतदार वाढले कसे ?

Rahul Gandhi said How did voters suddenly increase in Bawankule’s constituency?
राहुल गांधींच्या दाव्यामुळे ‘कामठी निवडणूक’ पुन्हा चर्चेत

Mumbai : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. गैर प्रकाराचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘ कामठी ‘ मतदारसंघाचा उल्लेख केला आहे. या मतदारसंघात 56 हजार मते कशी वाढली असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे उपस्थित केला असून, कामठीची निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ प्रमाणे हेराफेरी झाल्याचे म्हणले आहे. पाच वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी हेराफेरी कशी झाली हे स्पष्ट केले आहे. मतदार कसे वाढवले जातात याचे उदाहरण देताना म्हटले आहे की, कामठी विधानसभा मतदारसंघ या गैरप्रकारचे एक उत्तम उदाहरण आहे.

Voters Number : दीड तासांच्या भाषणात मोदींनी शब्दही काढला नाही !

2024 लोकसभा निवडणुकीत कामठी मतदार संघात काँग्रेसला 1.36 लाख मते मिळाली तर भाजपाला 1.19 लाख. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास तितकेच म्हणजे 1. 34 लाख मते मिळाली परंतु भाजपची मते अचानक वाढवून 1.75 लाख झाली. याचा अर्थ 56 हजार मते वाढली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या 35 हजार नव्या मतदारांची नावे नोंदवून त्यांना मतदार करून घेतले गेले.

Voters Number : भाजपने पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढवले कसे ?

त्यांच्यामुळेच ही अधिकची मते मिळाली म्हणजे ज्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले नव्हते आणि विधानसभेसाठी ज्या मतदारांना जोडले गेले. त्यांच्यातल्या जवळपास प्रत्येक जणच भाजपकडे खेचला गेला. म्हणजे ही सगळी नवी मते आकर्षित करणारा चुंबक कमळाच्या आकाराचा होता

कामठीमध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा पाच वर्षांत वाढलेली मते १७ ते १८ हजार होती आणि सहा महिन्यात मते वाढली. ही आली कुठून? ही वस्तुनिष्ठ माहिती राहुल गांधींनी त्यांच्या लेखातून दिल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत

Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी

पराभव समोर दिसला की माणूस आधीपासूनच त्या पराभवाची कारणे शोधून ठेवतो. अगदी असंच काही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत होत आहे. असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींचे आरोप खोडून काढले आहेत. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा, असा सल्लाही त्यांनी राहुल यांना दिला आहे.

काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ५ वर्षात महाराष्ट्रात ३१ लाख मतदार संख्या वाढली पण २०२४ लोकसभा निवडणूक ते २०२४ विधानसभा निवडणूक या अवघ्या ५ महिन्यात ४१ लाख मतदार वाढले यातच मोठे गौडबंगाल आहे. असा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही संशय व्यक्त केला आहे. अंतिम टक्केवारीत तब्बल ८ टक्क्यांची तफावत कशी हा प्रश्न उपस्थित केला आहे. सर्व यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाने अद्यावत असताना घोळ कसा काय झाला, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. असेही म्हणले आहे.

 

#Rahul Gandhi #Election Commission #Maharashtra election #Congress #Revenue Minister #bjp #kamthi #chandrshekhar bavankule #राहुल गांधी #निवडणूक आयोग #महाराष्ट्र निवडणूक #काँग्रेस #महसूल मंत्री #भाजप #कामठी #चंद्रशेखर बावनकुळे

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.