Breaking

Raj Thackeray: ‘सरकारने ही गोष्ट कायमची मनात कोरून ठेवावी..’- राज ठाकरें

Governments decision on Hindi revoked, marcha also Stopped : सरकारचा हिंदीबाबतचा निर्णय रद्द, मराठी माणसांचा मोर्चा ही स्थगित!

Mumbai : त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आणि पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्यात आला. यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू मोर्च्यांच्या निमित्ताने एकत्र येणार होते. दरम्यान सरकारच्या भूमिकेविरोधात सत्ताधारी पक्षातील काहींचा विरोध पाहता, अखेर सरकारने हिंदी संदर्भात काढलेले जीआर आज रद्द केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली. हिंदी विरोधात वातावरण तापत असताना ठाकरे बंधू आणि इतर समविचारी पक्षांचा पाच जुलै रोजी आयोजित केलेला मोर्चाही स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोर्चा नाही पण सहभाग घेण्याची तयारी दाखवली आहे.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन महाराष्ट्रात वाद सुरु होता. तिसरी भाषा सक्तीच्या करण्याच्या मागे सरकारचा हिंदी सक्ती करण्याचा डाव असल्याचं आरोप विरोधी पक्षांनी केला होतं. सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जुलै रोजी मोर्चा काढणार होते. मात्र, आता सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द करण्यात येत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारने हिंदीबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्ट करत सरकारला पुन्हा आव्हान दिलं आहे.

Cabinet Meeting : आता बोला… हिंदी भाषे बाबतचा सरकारच्या निर्णयाला शिंदे गटाचा विरोध !

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट! जशीच्या तशी पुढील प्रमाणे.
‘ इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.

पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.

अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत. म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !

हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगें पुन्हा मैदानात, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार

आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.

असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन. राज ठाकरे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !

राज ठाकरे यांच्या या पोस्ट नंतर, मनसे पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी विजय उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनीही, पत्रकार परिषद घेऊन आपल्या शैलीत सरकारवर टीका केली आणि पाच तारखेच्या मोर्चा ऐवजी सभा घेऊ त्याबद्दल लवकरच जाहीर करू असे स्पष्ट केले आहे.